आषाढ पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर पंतप्रधानांनी भगवान बुद्धांच्या उदात्त शिकवणींचे स्मरण केले
By : Polticalface Team ,Wed Jul 13 2022 18:09:33 GMT+0530 (India Standard Time)
दिल्ली:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आषाढ पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. श्री मोदींनी भगवान बुद्धांच्या उदात्त शिकवणीचेही स्मरण केले. पंतप्रधानांनी ट्विट केले; "आषाढ पौर्णिमेच्या पवित्र प्रसंगी शुभेच्छा. आम्ही भगवान बुद्धांच्या उदात्त शिकवणींचे स्मरण करतो आणि न्यायी आणि दयाळू समाजाची त्यांची प्रबुद्ध दृष्टी साकार करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करतो."
असे मानले जाते की या दिवशी बुद्धाने ज्ञानप्राप्तीनंतर पहिला उपदेश केला. पंतप्रधानांनी एक जुना व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यात भगवान बुद्धांना आदरांजली वाहताना त्यांच्या पूर्वीच्या टिप्पण्यांचा समावेश आहे.
तसेच पंतप्रधान मोदींनी ट्विट करून गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा पण दिल्या. ज्यांनी आम्हाला प्रेरणा दिली, मार्ग दाखवला आणि जीवनाबद्दल खूप काही शिकवलं त्या सर्व अनुकरणीय गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. आपला समाज शिकण्याला आणि ज्ञान मिळवण्याला खूप महत्त्व देतो. आपल्या गुरूंचे आशीर्वाद भारताला नव्या उंचीवर घेऊन जावेत अशी माझी इच्छा आहे.
वाचक क्रमांक :