मुख्यमंत्री शिंदेंनी आघाडी सरकारने घेतलेले अनेक निर्णय बदलले , आता सरपंच नगराध्यक्ष थेट जनतेतूनच;
By : Polticalface Team ,Thu Jul 14 2022 17:46:57 GMT+0530 (India Standard Time)
मुंबई : आताच्या सरकारने महाविकास आघाडी सरकारने घेतलेले अनेक निर्णय बदलले आहेत. सरपंच, नगराध्यक्ष हे आता जनतेतून निवडले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.
जनतेतून सरपंच, नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना घेतला होता. त्यानंतर आघाडी सरकारने हा निर्णय फिरवला होता. आता पुन्हा या सरकारने जनतेतून सरपंच व नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्र्यांनी काही महत्वाचे निर्णय :
- पेट्रोलवर 5 रुपये आणि डिझेलवर 3 रुपये प्रतिलिटर दर कमी करण्याचा निर्णय.
- राज्यात "स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) 2.0 अभियान" राबविण्यात येणार
- केंद्र पुरस्कृत अमृत अभियान 2.0 राज्यात राबवणार
- सरपंच, नगराध्यक्ष निवडणूक थेट जनतेतून होणार
- जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष यांचा कालावधी तीन महिन्यांपर्यंत वाढवला
- बाजार समितीतील सर्व शेतकऱ्यांना थेट मतदानाचा अधिकार.
- आणीबाणीच्या कालावधीत ज्या व्यक्तींना बंदिवास सोसावा लागला, अशा व्यक्तींचा सन्मान/यथोचित गौरव करण्याची (दि. 31 जुलै, 2020 रोजी बंद केलेली) योजना पुन्हा सुरु.
वाचक क्रमांक :