खरीप हंगाम पिक विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत 31 जुलै- कृषी अधिकारी संजय वाकडे
By : Polticalface Team ,Sun Jul 17 2022 20:11:10 GMT+0530 (India Standard Time)
करमाळा ( प्रतिनिधी अलिम शेख मो 9850686360 ): करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगाम नैसर्गिक आपत्ती व रोगामुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देण्यासाठी प्रधानमंत्री विमा योजनेअंतर्गत शेतकरी नोंदीसाठी राष्ट्रीय विमा संकेतस्थळ कार्यानित करण्यासंदर्भात शासनाने निर्देश दिले आहेत चालू खरीप हंगामात पीक विम्याचा हप्ता भरण्याची अंतिम मुदत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना 31 जुलै 2022 रोजी ची आहे तेव्हा पिक विमा योजनेत तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांनी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना केले आहे
पिक विमा योजनेसाठी आता शासनाने ई पीक पाहणी नोंदणीची अट रद्द केली आहे
पिक विमा योजना ही कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी घ्यावयाचा नसेल तर कर्ज घेतलेल्या अधिसूचित पीक काळ नोंदणी अंतिम मुदतीच्या सात दिवस आधी पर्यंत संबंधित नोंद विमा हप्ता कायम करणे बाबत घोषणा पत्र देणे आवश्यक आहे
जे कर्जदार शेतकरी योजनेत सहभाग घेणेबाबत घोषणापत्र देणार नाहीत त्या सर्व शेतकऱ्यांचा सहभाग नसल्याचे समजले जाईल या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगाम साठी दोन टक्के व नगदी पिकासाठी पाच टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे शेतकऱ्यांना ज्या पिकाचा विमा उतरावयाचा आहे ते पीक शेतात पेरल्या बाबतचे स्वतः घोषणापत्र सातबारा आठ अ आधार कार्ड बँक पासबुक झेरॉक्स नजीकच्या बँकेत अथवा आपले सरकार सर्व केंद्रावर विमा भरून पीक संरक्षित करावे याबाबत अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी करमाळा तालुक्यातील कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांनी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना केले आहे
वाचक क्रमांक :