ओबीसी बांधवांना आरक्षण मिळाल्यामुळे, श्रेयवादाच्या बांडगुळांचा सुळसळाट-दशरथ (आण्णा) कांबळे
By : Polticalface Team ,Fri Jul 22 2022 10:50:14 GMT+0530 (India Standard Time)
करमाळा-प्रतिनिधी
ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळावे, यासाठी सकल ओबीसी बांधवांच्या वतीने सर्व पक्षातील ओबीसी नेत्यांना घेऊन, तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन ओबीसी बांधवांची जनजागृती करण्याचा आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला. हा प्रयत्न करत असताना सर्वांना विश्वासात घेऊन आंदोलने, मोर्चे अथवा एखादा शासन प्रशासन यांना इशारा देणे. ह्या सर्व गोष्टी योग्य दिशेने घेऊन जाण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न केला. हे सर्व करत असताना आम्ही कधीही श्रेयवाद, राजकीय, सामाजिक अथवा कोणतेही महत्त्वाकांक्षी विचार न करता, फक्त आणि फक्त ओबीसी बांधवांना न्याय मिळावा. हाच एकमेव उद्देश ठेवून लढा दिला. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ओबीसी बांधवांना त्यांचे हक्क अधिकार मिळावे, यासाठी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्याच धर्तीवर आम्ही सुद्धा ज्या-ज्यावेळी जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी जात होतो. त्यावेळेस ओबीसी बांधवांना आम्ही एवढेच सांगत होतो की, त्यावेळेस ओबीसी बांधवांना जागृत करण्यासाठी बाबासाहेब होते. परंतु जर तुम्ही तुमच्या हक्क अधिकारासाठी आत्ता जागृत नाही झाला. तर परत तुम्हाला जागृत करण्यासाठी किंवा तुमचे हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी बाबासाहेब येणार नाहीत. या आमच्या सर्व विचारांवर ओबीसी बांधवही एकवटत चालला होता. कोरोना सारख्या महामारीमध्ये सुध्दा प्रा. शिवाजीराव बंडगर, दत्तात्रय अडसुळ, प्रशांत शिंदे, गणेश चिवटे, शितल क्षिरसागर, पत्रकार जयंत दळवी, नारायण पवार, कुंभार, किरण बोकन, विनोद महानवर, दराडे गुरुजी, निळकंठ अभंग, भर्तरीनाथ अभंग, सुभाष जाधव या ओबीसी नेत्यांना घेऊन आम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत समाज बांधवांपर्यंत दररोज भटकंती करत होतो. आमचा फक्त या ठिकाणी एवढाच शुद्ध हेतु होता की, ओबीसी बांधवांना त्यांचे हक्क अधिकार मिळाले पाहिजेत. त्यासाठी सर्वप्रथम आम्ही मोर्चे, आंदोलने, धरणे प्रदर्शन, निवेदने या सर्वच गोष्टींचा पर्याय अवलंबला होता. या सर्व बाबीतुन सरकारवर दबावतंत्राचा वापर करुन ओबीसी बांधवांचे अधिकार प्राप्त करुन घेणे. परंतु कोरोनासारख्या महामारीमुळे आम्हाला आमच्या आंदोलनांची दिशा नेहमी बदलावी लागली. परंतु जागृतीचा अग्नी आम्ही कधी हि थंड होऊ दिला नाही.
या ठिकाणी आम्हाला एवढेच सांगायचे आहे की, ओबीसींना आरक्षण मिळाले आहे. त्याबद्दल विविध पक्षाचे राजकीय नेते अभिनंदन करत आहेत. परंतु ओबीसींना खरोखरच राजकीय आरक्षण मिळावे, यासाठी कोणताही राजकीय पक्ष प्रभावीपणे काम करत नव्हता. फक्त चर्चा आणि आश्वासने एवढेच जनतेला प्रत्येकजन देत होता. परंतु जसा-जसा जनरेटा वाढत गेला, तसा-तसा सरकारवर दबावही मोठ्या प्रमाणात पडला. आम्हाला या ठिकाणी एवढेच सांगायचे आहे की, ज्याप्रमाणे बांडगुळ हे दुसऱ्याच्या जीवावर जगते. त्याप्रमाणे कोणतेही समाजासाठी चांगल्या हिताचे कार्य झाले की, राजकीय बांडगुळ सक्रिय होतात. व मोठे-मोठे बॅनर लावणे, घोषणा देणे व आनंदोत्सव साजरा करणे. व सर्व समाज बांधवांना ओरडून सांगणे कि, "मुझे गिनो"....ओबीसी बांधवांना राजकीय आरक्षण मिळाले. हे सर्व श्रेय त्या लढवय्या समाज बांधवांचे आहे. ज्यांनी ओबीसी समाज बांधवांना एकसंध ठेवून त्यांची वज्रमूठ तयार केली. व सरकारलाही झुकायला लावले. अशा सर्व परिश्रम घेतलेल्या समाज बांधव व जागृतीचा विस्तव तेवत ठेवणाऱ्या, या सर्व योद्यांचे हे श्रेय आहे. समाजाची जागृती करण्यासाठी पुढाकार घ्या. असे म्हटले असता, कोरोनाची कारणे पुढे करुन, कधीच समाजाला जागृतीच्या दोन गोष्टी सांगितल्या नाहीत. परंतु घरामध्ये बसुन "नथी मधून तीर मारणाऱ्या" बहाद्दरांना आम्ही एवढेच सांगू की, सत्ता ही येत असते-जात असते. परंतु समाजासाठी कोणत्या व्यक्तींनी योगदान दिले हे समाज सताड उघड्या डोळ्यांनी पहात असतो. फुकटच्या श्रेयवादासाठी व राजकारणामध्ये चमकण्यासाठी चुकीच्या बातम्या देऊन, ओबीसी अथवा इतर समाज बांधवांमध्ये संभ्रम निर्माण करू नये. कोणता ही समाजावर अथवा समाजबांधवावर अन्याय, अत्याचार झाला. तर अशा सर्वांसाठी आमची दारे नेहमी उघडी असतील. व अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी आमची भुमिका नेहमी अग्रेसर असेल हे मात्र नक्की!!!! सध्यातरी ओबीसी बांधवांना राजकिय आरक्षण मिळवुन देण्याकामी, महाराष्ट्र शासन व सर्वोच्च न्यायालय यांचे शेतकरी कामगार संघर्ष समितीच्या वतीने आभार व ओबीसी बांधवांना पुढील राजकिय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा....
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी