लोकमान्य टिळकांनी अखेरच्या श्वासापर्यंत देशाची अखंडपणे सेवा केली -प्रसिद्ध व्याख्याते अभिषेक उदमले
By : Polticalface Team ,Sun Jul 24 2022 18:49:31 GMT+0530 (India Standard Time)
लिंपणगाव( प्रतिनिधी) लोकमान्य टिळकांनी देशाच्या उत्तम जडणघडणीसाठी मोठा संघर्ष व त्याग केला तसेच अखेरच्या श्वासापर्यंत भारत देशाची अखंडपणे सेवा केली . त्यांचे जयंती निमित्त स्मरण करणे हे आपले सर्वांचे आद्य कर्तव्य असल्याचे असे गौरवोद्गार प्रसिद्ध व्याख्याते अभिषेक उदमले यांनी आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले आहे .श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील श्री व्यंकनाथ विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची 166 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .यावेळी या महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी टिळकांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय सस्ते व ज्येष्ठ शिक्षक आनंदा पुराणे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रेय सस्ते हे होते.
याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षण क्षेत्रातील प्रसिद्ध व्याख्याते श्री उदमले पुढे म्हणाले की, लोकमान्य टिळकांचा रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या छोट्या खेडेगावात जन्म झाला. लहानपणापासूनच लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे करारी होते. प्रामाणिक होते. जिद्दी होते. आणि एखाद्या निर्णयावर ठाम राहायचे. बालपणी देशाविषयी अपर सहानुभूती प्रेम जिव्हाळा होता. असे सांगून श्री उदमले पुढे म्हणाले की, लहानपणी टिळकांना सहज गुरुजींनी विचारलं की, मोठे झाल्यानंतर तुम्हाला काय व्हायचे आहे. त्यावेळेस क्षणभराचा ही विलंब न करता टिळकांनी उत्तर दिलं मोठं झाल्यानंतर मी काय होईल9 हे आत्ता सांगणार नाही. परंतु भविष्यामध्ये मला शेवटच्या श्वासापर्यंत देशाची सेवा करायची आहे. टिळकांच्या उत्तराने गुरुजी खूप प्रभावी झाले. भारतीय असंतोषाचे जनक म्हणून लोकमान्य टिळकांना ओळखले जाऊ लागले. स्वातंत्र्यलढ्याविषयी जनजागृती करण्यासाठी टिळकांनी केसरी व मराठा हे दोन वृत्तपत्र सुरू केले. व या वृत्तपत्रांमध्ये असलेल्या जहाल अग्रलेखामुळे लोक स्वातंत्र्य चळवळीत भाग घेऊ लागले. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच. अशी सिंहगर्जना त्यांनी अहमदनगरच्या भव्य सभेमध्ये केली होती. असे सांगून टिळकांच्या जीवन चरित्रावर श्री उदमले यांनी प्रकाश ज्योत टाकला.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री दत्तात्रेय सस्ते यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाले की, लोकमान्य टिळकांना लिखाणाची मोठी आवड होती, त्यांनी आपल्या बौद्धिक कौशल्याच्या जोरावर देशाच्या हितासाठी त्यांनी अग्रलेख लिहिले. पुढे पुढे त्यांनी केसरी व मराठा हे दोन वृत्तपत्र काढले. त्या वृत्तपत्राच्या माध्यमातून देशाची संस्कृती, त्यातून देशाची प्रगती, व देशाच्या स्वातंत्र्यासाठी या वृत्तपत्राच्या माध्यमातून जनतेला लोकमान्य टिळकांनी त्याकाळी मोठी दिशा दिली. देशाच्या जडणघडणीमध्ये टिळकांचे मोठे योगदान लाभले. असे सांगून ते पुढे म्हणाले की टिळकांच्या स्वप्नातला भारत आज संपूर्ण जगामध्ये सर्व क्षेत्रात अग्रेसर असल्याचे सांगून त्यांच्या १६६ व्या जयंतीनिमित्त प्राचार्य सस्ते यांनी यावेळी अभिवादन केले.
या कार्यक्रमास विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक शिवाजी इथापे यांनी केले. आभार शिक्षक ज्ञानदेव धायगुडे यांनी मानले.
दरम्यान श्रीगोंदा तालुक्यात शिक्षण क्षेत्रातील प्राथमिक ,माध्यमिक, महाविद्यालयांमध्ये लोकमान्य टिळकांना 166 व्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. जयंती दरम्यान विद्यार्थ्यांना लोकमान्य टिळकांच्या कार्याविषयी प्रबोधन करण्यात आले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी