By : Polticalface Team ,Fri Aug 05 2022 23:16:46 GMT+0530 (India Standard Time)
महागाई विरोधात राहुल गांधी यांनी काँग्रेस खासदारांसह संसद भवन ते राष्ट्रपती भवनापर्यंत पदयात्रा काढली. यावेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. या मोर्चासाठी पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. त्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिसांनी संसद भवन ते राष्ट्रपती भवन परिसरात कलम 144 लागू केले आहे.
सध्या देशात महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच बेरोजगारी देखील वाढत चालली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्यावतीने निषेध नोंदवण्यासाठी काळे कपडे परिधान करून देशभरात विविध ठिकाणी देशव्यापी आंदोलन सुरू आहे.
यामध्ये काँग्रेस आमदार, खासदार, यांच्यासह काँग्रेस नेते उपस्थित होते. तर महागाईविरोधात आम्ही ही लढाई लढत आहोत, देशातील महागाई कमी झाली पाहिजे, महागाई कमी होण्यासाठी केंद्र सरकारने उपाययोजना केल्या पाहिजेत, असे काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यावेळी म्हणाल्या वाचक क्रमांक :