By : Polticalface Team ,Sat Aug 06 2022 19:19:18 GMT+0530 (India Standard Time)
मुंबई : भंडाऱ्यात एका 35 वर्षीय विवाहित महिलेवर सामुहिक अत्याचार करण्यात आला. मात्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत दखल घेतली नसल्याचा आरोप शिवसेना उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी केला.
नीलग गोऱ्हे म्हणाल्या, पीडितेवर जंगलात नेवून तिच्यावर अत्याचार करत मारहाण करण्यात आली. सध्या या पीडितेची प्रकृती गंभीर आहे. तिच्यावर पाच शस्त्रक्रिया कराव्या लागणार आहेत.
वर्तमानपत्राने दखल घेतली मग कळालं. मी पोलीस महानिरीक्षक यांच्याशी बोलले आहे. अजूनही या प्रकरणातील एक आरोपी सापडला नाही. तिचे कुटुंब गरीब आहे. शिवाय ही घटना निर्भयासारखी असून पीडितेची झुंज सुरू असल्याचं, गोऱ्हे यांनी सांगितलं