By : Polticalface Team ,Thu Aug 11 2022 20:12:09 GMT+0530 (India Standard Time)
त्यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. तर आता पंकजा मुंडे यांनी सरकारवर भाष्य केलंय.
कदाचित माझी पात्रता नसेल म्हणून मंत्रिपद दिलं नसेल, जेव्हा त्यांना वाटेल तेव्हा मंत्रिपद देतील. यावर माझं काहीच म्हणणं नाही, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे पंकजा मुंडे यांची नाराजी पुन्हा एकदा दिसून आली.
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये पंकजा मुंडे यांना स्थान मिळेल अशी चर्चा होती. मात्र त्यांना स्थान देण्यात आले नाही, एवढेच नव्हे तर या सरकारमध्ये एकाही महिला आमदाराला मंत्रिपद देण्यात आले नाही. त्यामुळे विरोधीपक्षाकडून देखील राज्य सरकारवर टीका होत आहे.
आज रक्षाबंधन असल्याने पंकजा मुंडे यांनी महादेव जानकर यांना राखी बांधली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना कदाचित माझी पात्रता नसेल म्हणून मंत्रिपद दिलं नसेल, असा टोला भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना लगावला. दरम्यान, या निमित्ताने तरी त्यांनी आपली खदखद व्यक्त केली आहे. त्यामुळे आता येणाऱ्या पुढच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये तरी त्यांना स्थान देण्यात येणार का ? हे पाहणं महत्वाचं असणार आहे. वाचक क्रमांक :