कोविड काळात पोलिस प्रशासना समवेत उल्लेखनिय कार्य करणाऱ्या माजी सैनिकांनी उपस्थित रहावं -मेजर निळकंठ उल्हारे
By : Polticalface Team ,Sat Aug 13 2022 21:19:55 GMT+0530 (India Standard Time)
दि. 13ऑगस्ट 2022
प्रतिनिधी ,
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त मागील कोवीड-19च्या संक्रमित काळात अहमदनगरचे पोलीस अधीक्षक आखीलेश यादव यांच्या आवाहनानंतर , जयहिंद माजी सैनिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यामध्ये विविध पोलीस स्टेशनमध्ये माजी सैनिक, विशेष पोलीस अधिकारी म्हणून नियुक्त केले होते. त्या सैनिकांनी सेवानिवृत्तीनंतर परिवाराला वेळ न देता परत एकदा राज्य सरकारच्या मदतीला धावून आले. प्रतिबंधित वेळेत कोणीही कोणाची मदत करत नव्हते .हे फक्त कोरोना काळात समजले. अशा वेळी या सैनिकांनी पोलिस प्रशासनासोबत सर्व सक्रिय ड्युटीमध्ये पूर्ण झोकून देऊन, सर्व स्तरावर अगदी खांद्याला खांदा लावून लगातार चार महिने कसल्याही प्रकारचा मोबदला न घेता सर्वतोपरी रात्रंदिवस अत्यंत जिकरीचे काळात पोलिस प्रशासना अनमोल अशी मदत केली.
नगर तालुक्याचे तहसीलदार उमेश पाटील यांच्याबरोबर परप्रांतीय कामगारांना त्यांच्या घरी पोहोच करण्या करता एस टी व रेल्वेमध्ये एकंदरीत बारा हजार कामगार घरपोच करण्यात महसूल प्रशासनाला खूप मदत केली .या उल्लेखनिय कार्याचा लेखाजोखा आणी विशेष पाठपुरावा जयहिंद माजी बहु .संस्थेचे अध्यक्ष मेजर निळकंठ उल्हारे यांनी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांचे कडे केला .सदर बाबींवर पोलिस अधीक्षक यांनी तत्काळ या सर्व माजी सैनिकांचा सन्मान करण्याचा निर्णय घेऊन संबंधित विभागामार्फत आदेश पारित केला .
अहमदनगर शहर व
सर्व तालुका पोलीस स्टेशन मधील माजी सैनिकांचा सन्मान सोहळा अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांचे हस्ते 15 ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर येथे सकाळी सात वाजता झेंडावंदनाच्या कार्यक्रमात करण्यात येणार असल्याची माहिती जयहिंद माजी सैनिक बहुउद्देशीय सेवा संस्था अध्यक्ष मेजर निळकंठ उल्हारे यांनी पत्रकाद्वारे दिली.
जिल्ह्यातील तमाम पोलिस स्टेशन मध्ये कोवीड काळात उल्लेखनीय कार्य केलेल्या माजी सैनिकांनी दिनांक 15 ऑगस्ट रोजी सकाळी साडेसहा वाजता पोलिस अधीक्षक कार्यालय अहमदनगर येथे उपस्थित रहावे,असेआवाहन मेजर निळकंठ उल्हारे यांनी केले आहे.
वाचक क्रमांक :