लहुजी आर्मीच्यावतीने मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात यासाठी मातंग समाज आक्रोश आंदोलन करण्यात आले.

By : Polticalface Team ,Fri Aug 19 2022 19:35:47 GMT+0530 (India Standard Time)

लहुजी आर्मीच्यावतीने मातंग समाजाच्या प्रलंबित मागण्या मान्य कराव्यात यासाठी मातंग समाज आक्रोश आंदोलन करण्यात आले. दिनांक १९ ऑगस्ट: लहुजी आर्मी संघटनेच्यावतीने मातंग समाजाच्या मागण्यासाठी आजाद मैदान येथे मातंग समाज आक्रोश आंदोलन करण्यात आले. या वेळी मातंग समाजावर होणारे अन्याय-अत्याचार तात्काळ थांबविण्याकरिता सरकारने अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी करून जलदगतीने न्यायालयात कार्यवाही करावी, पानशेत पूरग्रस्त मागासवर्गीय सहकारी संस्थेतील मातंग समाजाच्या मूळ पूरग्रस्त व त्यांच्या वारसांच्या प्रलंबित मागण्याची तत्काळ दाखल घ्यावी, क्रांतीवीर लहजी साळवे मातंग अभ्यास आयोगाने करण्यात आलेल्या ६८ शिफारशीची महाराष्ट्र शासनाने खातेनिहाय आदेश काढण्यात यावा, केंद्र शासनाने साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, आद्य क्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे संगमवाडी येथील राष्ट्रीय स्मारकाच्या जमिनीवर टाकण्यात आलेले आरक्षण हे आर्ट आणि गॅलरी ऐवजी स्मारक असे करावे, मातंग समाजाच्या मालकीच्या एक किवा दोन गुंठे जमिनीचा ८४ क शेरा विना नजराणा घेता कमी करण्यात यावा, कोरोनाच्या महामारीमुळे बाधित झालेल्या आणि ज्यांचे सिबिल(cibil) चे आकडेवारी कमी झाली आहे त्या मातंग तरुण-तरुणी साठी उद्योग-धंद्याचे कला-कौशल्यचे प्रशिक्षण देवून विना सिबिल(cibil) ची आकडेवारी ग्राह्य धरून कर्ज उपलब्ध करून द्यावे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी)च्या धर्तीवर साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) स्थापन करण्यात यावी, अनुसूचित जाती व जमाती करिता असलेल्या एकत्रित आरक्षणाचे अ ब क ड प्रमाणे लोकसंखेनुसार वर्गवारी करण्यात यावी. या मागण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते. या संदर्भात लहुजी आर्मी चे संस्थापक अध्यक्ष अंबादास सूर्यवंशी म्हणाले की, भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला समान न्याय व हक्क दिला आहे. त्याच बरोबर मुलभूत अधिकार हि दिले आहे. संविधानात अनुक्रमे भाग ३ आणि ४४ असा त्याचा क्रम आहे. संविधानाच्या उद्देशपात्रिकेत सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय तसेच दर्जाची व संधीची समानता करून देण्याची हमी देण्यात आली आहे. परंतु आज एकविसाव्या शतकातही मातंग समाज विकासापासून वंचित आहे. देशाला स्वातंत्र मिळून आजतागायत ७५ वर्ष झाली. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिक दृष्ट्या मागास असल्याने अनेक मुलभूत समस्या आणि प्रश्न निर्माण झाले आहेत. यामध्ये अशिक्षितपणा, दारिद्र, बेरोजगारी, अन्याय अत्याचार, व्यसनधीनता आणि गुन्हेगारीचा समावेश आहे. मागण्या केंद्र व राज्य शासनाकडे प्रलंबित आहेत. लोकशाही मध्ये मागण्या मान्य करण्यासाठी सनदशीर मार्गाने आम्ही प्रयत्न करत आहे. मागण्या मान्य न झाल्यास मातंग समाज राज्यभर तीव स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. सदर आंदोलनाला प्रभाकर इंगळे, गोपीनाथ कांबळे, नरसिंह सूर्यवंशी, मुकेश जाधव, परशुराम भवाल, दिलीप खुडे, किशोर खुडे, मोहन खिल्लारे, विशाल ढावरे, सागर वायदंडे, कविता ननावरे, माया वायदंडे, कमल बागाव, वर्षा खुडे, अश्विनी अवघडे, मीरा आरडे, नंदा शिंदे, मंदा शिंदे, उज्जवला गिरे, तानाजी दाकले, प्रशांत अस्वरे, रमेश राजगुरू आदी उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी