जालोरमध्ये दलित विद्यार्थ्याची हत्या, हा मानवतेला लागलेला कलंक, दौंड मधिल विविध संघटना आक्रमक,  
                      
                
            
               By : Polticalface Team ,Sat Aug 20 2022 12:26:31 GMT+0530 (India Standard Time)
       
               
                           
              
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, 
सह प्रमोद शितोळे,
दौंड दि.१९/ऑगस्ट २०२२,रोजी दौंड तालुक्यातील यवत पोलीस स्टेशन येथे संभाजी ब्रिगेड संघटनेच्या माध्यमातून जिल्हा संघटक भरत भुजबळ व  जिजाऊ ब्रिगेड दौंड तालुका, सारिका ताई भुजबळ तसेच विविध राजकीय पक्ष संघटना पदाधिकारी
 कार्यकर्त्यांनी यवत पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक विठ्ठल जगताप, ठाणे अंमलदार नारायण जाधव यांना लेखी निवेदन देऊन, मानवतेला कलंकित करणाऱ्या या हत्याकांड घटनेचा जाहिर निषेध व्यक्त करण्यात आला, राजस्थान राज्यातील जालोरमध्मे शाळेत तिसरीच्या वर्गात शिकत असलेल्या ९ वर्षाच्या दलित विद्यार्थ्यांने  सवर्णासाठी ठेवलेल्या माठातून पाणी पिला या कारणावरून जातियवादी शिक्षकिने अत्यंत क्रूरपणे मारहाण करुन चिमुकल्या विद्यार्थ्याला जीवे ठार मारले या घटनेचा देशात व महाराष्ट्रात पडसाद उमटले आहेत, दौंड तालुक्यातील विविध राजकीय पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वर्ण व्यवस्था व जातीवादी प्रवृत्ती विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला आहे, 
    
भारत देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जातोय दि,१३ ऑगस्ट रोजी हर घर तिरंगा, राष्ट्रीयध्वज उभारून स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला मात्र या देशातील वर्ण व्यवस्था संपुष्टात येत नाही, अस्पृश्यता मानसाच्या मनात रुतुन बसली आहे हिच मोठी शोकांतिका ? शिक्षकाचे  कर्तव्य विसरून गेलेला सुशिक्षित नागरिक जर जाती पातीच्या विषारी नागाला दूध पाजीत असेल तर या नागाचे शिर टेचण्याची वेळ येऊन ठेपली आहे ९ वर्षाच्या विद्यार्थ्यांला आपला जीव गमवावा लागला हि मानवतेला काळीमा फासणारी वृत्ती चा नायनाट करावा लागणार आहे, फुले शाहू आंबेडकर चळवळीतील राजकीय पक्ष संघटना पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यावर उतरून हा लढा तेवत ठेवण्यासाठी पुढे आल्या शिवाय राहणार नाहीत, असे स्पष्ट मत
 संभाजी ब्रिगेड, झोपडपट्टी सुरक्षा दल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट, रयत शेतकरी संघटना, अखिल भारतीय समता परिषद, यशवंत शेना, वंचित बहुजन आघाडी, मातंग नवनिर्माण सेना, जिल्हा व तालुका पदाधिकारी यांनी तीव्र विरोध दर्शवित मनोगत व्यक्त केले आहे, भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत सर्व धर्म समभाव, आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा, फक्त विचार करुन चालणार नाही तर तो प्रत्येकाने अंगीकार करणे आवश्यक असल्याचे विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले, वर्ण व्यवस्था जातिवाद संपुष्टात आल्याशिवाय देशातील नागरिक खऱ्या अर्थाने  स्वातंत्र्याचा अर्थ समजू शकले नाहीत,  प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य संविधानाच्या तरतुदीनुसार देण्यात आले आहे मात्र या हत्याकांड प्रकरणी व्यक्तीला स्वतंत्र असल्याचा फक्त भास होत आहे की काय हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे,
राजस्थानच्या जालोर मधील अवघ्या ९ वर्षांच्या चिमुकल्या दलित विद्यार्थ्यांला आपला जीव मगवावा वागतो  हि बाब अतिशय निंदनीय आहे, केवळ या ९ वर्षाच्या चिमुकल्याने सवर्ण शिक्षकांसाठी राखून ठेवलेल्या माठातुन पाणी पिल्याच्या कारणावरून शिक्षिकाने रागातून केलेली निर्घृण हत्या, हा मानवतेला लागलेला कलंक आहे. या अमानुष जातीवादाचा तीव्र निषेध करीत, मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जिल्हा व दौंड तालुका विविध पक्ष संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे, वर्णव्यवस्थेचे विषारी विचार देशातील मानवतेला कलंकित करत आहेत, त्यामुळेच डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी २० मार्च १९२७ साली महाड येथे मनुस्मृतीचे दहन केले होते, 
याचा विचार बहुजन समाजातील प्रत्येक व्यक्तीला करावाच लागणार आहे, समाजातून वर्णव्यवस्था हद्दपार व्हावी, उच निच खालचा वरचा जाति भेदभाव नष्ट केला पाहिजे. असे मत विविध राजकीय पक्षांतील पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी व्यक्त करुन सदर घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केली, या वेळी, अंकुशराव हंबीर, मंगेश रायकर, दत्ता डाडर, अनिल गायकवाड, बबनराव गायकवाड, डॉ संतोष बेडेकर, उमेश म्हेत्रे, काळुराम शेंडगे, बापु मोरे, किशोर वचकल, अदी मान्यवर उपस्थित होते,
              
              
वाचक क्रमांक :
                                    
                                    
                                                                   
                                                              
                                                              
                                    
                                        
                                          
                            
              							
							
							
							प्रकाश म्हस्के 
							संपादक 							
 
							
              
                
 
                
                
             		  	 							  
  स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
      
   
														  
  भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती  
  							  
  श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
  							  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
      
   
														  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
  							  
  कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 
  							  
  कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न 
      
   
														  
  त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी 
  							  
  श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला  भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
  							  
  दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
      
   
														  
  निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
  							  
  बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 
  							  
  लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना. 
      
   
														  
  पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे 
  							  
  पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट 
  							  
  दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
      
   
														  
  लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
  							  
  दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई 
  							  
  श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
      
   
														  
  श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष