जालोरमध्ये दलित विद्यार्थ्याची हत्या, हा मानवतेला लागलेला कलंक, दौंड मधिल विविध संघटना आक्रमक, 

By : Polticalface Team ,Sat Aug 20 2022 12:26:31 GMT+0530 (India Standard Time)

जालोरमध्ये दलित विद्यार्थ्याची हत्या, हा मानवतेला लागलेला कलंक, दौंड मधिल विविध संघटना आक्रमक,  

दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, सह प्रमोद शितोळे, दौंड दि.१९/ऑगस्ट २०२२,रोजी दौंड तालुक्यातील यवत पोलीस स्टेशन येथे संभाजी ब्रिगेड संघटनेच्या माध्यमातून जिल्हा संघटक भरत भुजबळ व जिजाऊ ब्रिगेड दौंड तालुका, सारिका ताई भुजबळ तसेच विविध राजकीय पक्ष संघटना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी यवत पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक विठ्ठल जगताप, ठाणे अंमलदार नारायण जाधव यांना लेखी निवेदन देऊन, मानवतेला कलंकित करणाऱ्या या हत्याकांड घटनेचा जाहिर निषेध व्यक्त करण्यात आला, राजस्थान राज्यातील जालोरमध्मे शाळेत तिसरीच्या वर्गात शिकत असलेल्या ९ वर्षाच्या दलित विद्यार्थ्यांने सवर्णासाठी ठेवलेल्या माठातून पाणी पिला या कारणावरून जातियवादी शिक्षकिने अत्यंत क्रूरपणे मारहाण करुन चिमुकल्या विद्यार्थ्याला जीवे ठार मारले या घटनेचा देशात व महाराष्ट्रात पडसाद उमटले आहेत, दौंड तालुक्यातील विविध राजकीय पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वर्ण व्यवस्था व जातीवादी प्रवृत्ती विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला आहे, भारत देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जातोय दि,१३ ऑगस्ट रोजी हर घर तिरंगा, राष्ट्रीयध्वज उभारून स्वातंत्र्याचा ७५ वा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला मात्र या देशातील वर्ण व्यवस्था संपुष्टात येत नाही, अस्पृश्यता मानसाच्या मनात रुतुन बसली आहे हिच मोठी शोकांतिका ? शिक्षकाचे कर्तव्य विसरून गेलेला सुशिक्षित नागरिक जर जाती पातीच्या विषारी नागाला दूध पाजीत असेल तर या नागाचे शिर टेचण्याची वेळ येऊन ठेपली आहे ९ वर्षाच्या विद्यार्थ्यांला आपला जीव गमवावा लागला हि मानवतेला काळीमा फासणारी वृत्ती चा नायनाट करावा लागणार आहे, फुले शाहू आंबेडकर चळवळीतील राजकीय पक्ष संघटना पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यावर उतरून हा लढा तेवत ठेवण्यासाठी पुढे आल्या शिवाय राहणार नाहीत, असे स्पष्ट मत संभाजी ब्रिगेड, झोपडपट्टी सुरक्षा दल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट, रयत शेतकरी संघटना, अखिल भारतीय समता परिषद, यशवंत शेना, वंचित बहुजन आघाडी, मातंग नवनिर्माण सेना, जिल्हा व तालुका पदाधिकारी यांनी तीव्र विरोध दर्शवित मनोगत व्यक्त केले आहे, भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत सर्व धर्म समभाव, आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा, फक्त विचार करुन चालणार नाही तर तो प्रत्येकाने अंगीकार करणे आवश्यक असल्याचे विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले, वर्ण व्यवस्था जातिवाद संपुष्टात आल्याशिवाय देशातील नागरिक खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा अर्थ समजू शकले नाहीत, प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य संविधानाच्या तरतुदीनुसार देण्यात आले आहे मात्र या हत्याकांड प्रकरणी व्यक्तीला स्वतंत्र असल्याचा फक्त भास होत आहे की काय हा खरा प्रश्न निर्माण झाला आहे, राजस्थानच्या जालोर मधील अवघ्या ९ वर्षांच्या चिमुकल्या दलित विद्यार्थ्यांला आपला जीव मगवावा वागतो हि बाब अतिशय निंदनीय आहे, केवळ या ९ वर्षाच्या चिमुकल्याने सवर्ण शिक्षकांसाठी राखून ठेवलेल्या माठातुन पाणी पिल्याच्या कारणावरून शिक्षिकाने रागातून केलेली निर्घृण हत्या, हा मानवतेला लागलेला कलंक आहे. या अमानुष जातीवादाचा तीव्र निषेध करीत, मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जिल्हा व दौंड तालुका विविध पक्ष संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे, वर्णव्यवस्थेचे विषारी विचार देशातील मानवतेला कलंकित करत आहेत, त्यामुळेच डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी २० मार्च १९२७ साली महाड येथे मनुस्मृतीचे दहन केले होते, याचा विचार बहुजन समाजातील प्रत्येक व्यक्तीला करावाच लागणार आहे, समाजातून वर्णव्यवस्था हद्दपार व्हावी, उच निच खालचा वरचा जाति भेदभाव नष्ट केला पाहिजे. असे मत विविध राजकीय पक्षांतील पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी व्यक्त करुन सदर घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केली, या वेळी, अंकुशराव हंबीर, मंगेश रायकर, दत्ता डाडर, अनिल गायकवाड, बबनराव गायकवाड, डॉ संतोष बेडेकर, उमेश म्हेत्रे, काळुराम शेंडगे, बापु मोरे, किशोर वचकल, अदी मान्यवर उपस्थित होते,
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी