शेतकरी वर्गात बैलपोळा हा सण सर्वात लोकप्रिय असण्याचे काय कारणे

By : Polticalface Team ,Fri Aug 26 2022 18:20:57 GMT+0530 (India Standard Time)

शेतकरी वर्गात बैलपोळा  हा सण सर्वात लोकप्रिय असण्याचे काय कारणे बैलपोळा हा भारतीय सिंधू कृषी संस्कृतीतील सण. हा सण सबंध शेतकरी वर्गामध्ये साजरा केला जातो. साहजिकच ह्या सणाच्या निमित्ताने काही प्रश्न पडतात.काय आहे या सणामागील नेणीव? अजूनही शेतकरी वर्गात हा सण सर्वात लोकप्रिय असण्याचे काय कारण आहे? ह्या सणाची नेणीव येथील शेतकरी वर्गात इतकी घट्ट आहे की ज्यांच्याकडे स्वतःची बैल नसतील ते लोक या दिवशी मातीची बैल जोडी करून त्यांची पुजा करतात. त्या दिवशी गोडधोड जेवायला करून पुरण पोळीचा घास बैलांना भरवतात. त्या दिवशी कुठल्याही प्रकारचे श्रम हे बैलांकडून करून घेतले जात नाही त्या दिवशी केवळ त्यांना अंघोळ घालून, सजवून सन्मानाने पुजले जाते. गावातील मुख्य मंदिराला त्यांना घेवून प्रदक्षिणा घातल्या जातात. इ. सन. पूर्व 2800 च्या दरम्यान लाकडी नांगराचा शोध लागल्याचे काही अर्कियोलोजिकल पुराव्यावरून समोर आलेले आहे. असाच नांगराच्या शोधाचा पहिला पुरावा हा कालिबंगण येथील नांगरलेल्या शेतीचा असल्याचे सिद्ध झालेले आहे. त्या अगोदर म्हणजे सिंधू संस्कृतीच्या पूर्वकाळात स्त्रीसत्तेत ही शेती ही हस्तश्रमाने केली जात होती स्त्रीसत्तेच्या नंतर म्हणजे सिंधोत्तर काळात लाकडी नांगराच्या शोधाने स्त्रीसत्तेच्या जागी मातृसत्ताक राजर्षीसत्ता येवून शेती ही बैलाच्या साह्याने करणे सुरू झाले असावे. स्त्रिसत्तेतील हस्तश्रमाच्या शेतीच्या तुलनेत नांगराच्या शोधाने बैलाच्या साह्याने केल्या जाणाऱ्या शेतीतून मिळणारे वरकड हे दुप्पटीने होते. हस्तश्रमाच्या शेतीत‌ सबंध गण हा केवळ काहीच क्षेत्र खेडू शकत असे त्याला क्षेत्राची, अन् उत्पादनाची मर्यादा होती मात्र नांगराच्या शेतीने ही मर्यादा संपुष्टात येवून अधिकचे क्षेत्र लागवडीखाली आणणे शक्य झाले. त्यामुळे एकूणच शेतीक्षेत्र आणि या शेतीत वरकड उत्पादन यामुळे गणाची भरभराट झाली, समृध्दी आली. हे केवळ शक्य झाले बैलाच्या साह्याने केल्या जाणाऱ्या नांगराच्या शेतीमुळे त्यामुळेच त्याच्याप्रति पूज्यभाव व्यक्त करणे हा सिंधूजणांचा व्यवहार झाला. याच पूज्यभावातून सिंधू संस्कृतीच्या सिल्सवर बैलाची प्रतिकृती साकार झाली असावी . काही सीलवर बैलाची मुद्रा उमटवली असल्याचे समोर आलेले आहे. जेव्हा ही जाणीव त्यांच्या नेनिवेच्या अंधारात गडप झाली तेव्हा बैलांप्रती असलेला पूज्यभावाचा अवशेष हा कर्मकांडाच्या रूपात म्हणजे या बैलपोळा या सणाच्या रुपात शिल्लक राहिला. आजही शेतीत बैलांशिवाय शेतीला पर्याय नाही. भलेही या 21 व्या शतकात बैलाची जागा ही बहुतांशी ट्रॅक्टरने घेतली असेल मात्र तरीही अजूनही शेतीसाठी बैलांची असलेली आवश्यकता टिकून आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी