उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत पंचायत समिती श्रीगोंदा अंतर्गत खरातवाडी येथे महिला मेळावा आयोजित

By : Polticalface Team ,Sat Aug 27 2022 08:28:47 GMT+0530 (India Standard Time)

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत पंचायत समिती श्रीगोंदा अंतर्गत खरातवाडी येथे महिला मेळावा आयोजित श्रीगोंदा: उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत पंचायत समिती श्रीगोंदा अंतर्गत खरातवाडी येथे महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता सदर महिला मेळाव्यासाठी कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पाटील कुकड़ी सहकारी साखर कारखाना संचालिका डॉ. प्रणोती जगताप पंचायत समिती सदस्या कल्याणी लोखंडे प्रभाग समन्वयक कृष्णा सरगर सी आर पी शीतल शिर्के, सरपंच सूर्यजीत पवार, उपसरपंच लक्ष्मण इथापे, ग्रामपंचायत सदस्य बापूराव कदम, सुभाष पंदरकर तसेच डॉ. संतोष पंदरकर उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. प्रणोती जगताप यांनी बोलताना सांगितले की महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत महिलांना स्वरोजगार उपलब्ध होत आहे. ग्रामीण भागातील महिलांना छोट्या उद्योगातून रोजगार निर्माण करून देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. यात केंद्राचा ७५ तर राज्याचा २५ टक्के निधी देते. या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगाराची दिशा मिळत आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील अनेक महिलांनी सक्षमीकरणाकडे यशस्वी झेप घेतली आहे. कोरोनाच्या महामारीतही बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्ष्मीकरणासाठी प्रयत्नशील आहेत. बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिला एकत्र येऊन मास्क तयार करणे आणि नवनवीन वस्तू तयार करण्याचे काम करत आहे. यामुळे या दिवसातही त्यांना नवी उमेद मिळाली आहे.

तळागाळातील कुटुंबाना स्वयंरोजगार मिळावा व दारिद्रय कमी होऊन कुटुंब आर्थिक सक्षम व्हावे म्हणून सरकार विविध योजना राबवते. त्यापैकीच एक म्हणजे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनन्नोती अभियान. ग्रामीण भागात महिला विशिष्ट उद्दीष्ट घेऊन एकत्र येतात. त्यांना सरकार या अभियानातून बळ देत आहे.यामुळे या महिलांना रोजगाराची संधी प्राप्त झाली आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान हे महिलांना योग्य तो रस्ता दाखविणारे अभियान आहे. महिलांनी आपले स्थान उंचविण्यासाठी आत्मविश्वास वाढविण्यासाठी दोन पावले टाकायचे आहेत कारण आपण पाहत आहोत आज स्त्री ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहे. आज गावच्या सरपंच यापासून ते राष्ट्रपती पदांपर्यंत महिला जाऊन पोहोचले आहेत आपल्या महिलांना या उमेद अभियाना ने खरच सुवर्णसंधी प्राप्त करून दिली आहे त्याच सोन करायला काहीच हरकत नाही.या कार्यक्रमामध्ये उमेद योजनेची माहिती सांगून महिलांना बचत गट स्थापन करण्याचे ठरले त्यानुसार खरातवाडी येथील 140 पेक्षा जास्त महिलांनी उपस्थिती दर्शविली आणि उमेद योजनेमध्ये सहभागी होऊन आपल्या कुटुंबाचा विकासास हातभार लावण्याचे ठरविले. यावेळी पंचायत समिती सदस्या कल्याणी लोखंडे, सी आर पी शीतल शिर्के आणि प्रभाग समन्वयक यांनी बचत गटाचे फायदे समजावून सांगून जास्तीत जास्त गट स्थापन करण्याचे अवाहन करण्यात आले.

सदर कार्यक्रमासाठी बापूराव शेंडगे, किसन इथापे, सुरेश भापकर, बाजीराव इथापे, बाबा महाराज इथापे, दत्तू इथापे, तात्या इथापे, संतोष खरात, संभाजी खरात,सुनील इथापे, दत्तात्रय सिताराम इथापे, गणेश इथापे,भानुदास भापकर, भास्कर गोरे, बाळासाहेब इथापे, नाना इथापे, बंडू पारखे, बाळू खरात, शरद इथापे, संजय फराटे, अशोक मोरे, चंद्रकांत भापकर, अंगद पुराणे, भाऊसाहेब खरात आणि विकास राजेभोसले आदी उपस्थित होते.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी