दौड, पुरंदर, बारामती, जानाई शिरसाई व पुरंदर उपसा सिंचन योजना, पूर्ण क्षमतेने सुरू होणार, आमदार राहुल कुल

By : Polticalface Team ,Sat Aug 27 2022 17:23:45 GMT+0530 (India Standard Time)

दौड, पुरंदर, बारामती, जानाई शिरसाई व  पुरंदर उपसा सिंचन योजना, पूर्ण क्षमतेने सुरू होणार, आमदार  राहुल कुल दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, सह प्रमोद शितोळे, पुणे मुंबई, दौड पुरंदर बारामती, जनाई सिरसाई पुरंदर उपसा सिंचन योजना पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी सकारात्मक आश्वासन उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र जी फडणवीस यांनी दिल्याची माहिती दौंड तालुका आमदार अँड राहुल कुल, यांनी सांगितले आहे. या वेळी बोलताना आमदार राहुल कुल म्हणाले पुणे जिल्ह्यातील दौंड पुरंदर आणि बारामती या तिन्ही तालुक्याच्या दृष्टीने जनाई शिरसाई आणि पुरंदर सिंचन योजने मुळे, या भागातील जिरायत जमिनीवर हिरवळ निर्माण करण्यासाठी वरदान ठरणार असून, गेली अनेक वर्षां पासून हे काम रखडलेले आहे.

दौड पुरंदर बारामती तालुक्यातील जिरायत भागात पाणी प्रश्नावर, आमदार राहुल कुल यांनी विधानसभेत विचारलेल्या जोरदार प्रश्नावर अधिवेशन लक्षवेधी ठरले आहे. या योजनेचा फायदा दौंड तालुक्यातील ताम्हणवाडी, बोरीऐंदी, बोरीभडक, डाळिंब, भांडगाव, खोर, पडवी, देऊळगावगाडा, कुसेगाव, वासुंदे, हिंगणी गाडा, रोटी, जिरेगाव, पांढरेवाडी, या गावातील सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जिरायत व दुष्काळी परिस्थितीचा काया पालट झाल्या शिवाय राहणार नाही, असे मत कुल यांनी व्यक्त केले, दौंड तालुक्याच्या उशाशी जल वाहिणी, जनाई शिरसाई व पुरंदर जलसिंचन योजना कार्यन्वित आहेत. मात्र या पाण्याचा उपयोग दौंडकर जनतेला आज पर्यंत निश्चित स्वरूपात फायदा झाला नाही. असे परखड मत विधानसभेत आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केले,

दौंड तालुक्यातील या गावांना पाण्याच्या प्रश्नावर महत्वपूर्ण भूमिका व दुष्काळी गावांना न्याय मिळवा अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी केली आहे. जानाई शिरसाई उपसा सिंचन योजनेची प्रकल्पीय सिंचन क्षमता, 13,835, हेक्टर असून, पुरंदर उपसा सिंचन योजनेची प्रकल्पीय सिंचन क्षमता ही 25,753 हेक्टर इतकी आहे. दौंड, पुरंदर बारामती तालुक्यातील जिरायती व दुष्काळी भाग असल्याने पिण्याचे पाणी व चिंतनाच्या पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी सोडवण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने कोट्यावधी रुपये खर्च करून या दोन्ही सिंचन योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. जानाई शिरसाई योजनेसाठी, 3.60 टी एम सी, तर पुरंदर योजनेसाठी, 4 टीएमसी पाणी साठा राखीव ठेवण्यात येऊन देखील पुरेशा प्रमाणात पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा केला जात नाही, हि मोठी शोकांतिका आहे, हि योजना सुरू होऊनही पूर्ण क्षमतेने चालू नाही, योजनेसाठी करण्यात आलेल्या पाईप लाईनला मोठ्या प्रमाणात गळती दिसून येते, दौंड च्या दक्षिण भागातील अनेक गावे अद्यापही या पाण्या वाचुन वंचित असल्याचे महाराष्ट्र राज्य विधानसभेत अँड राहुल कुल यांनी सरकारच्या निदर्शनास आणून दिले आहे.

दौंड पुरंदर बारामती तालुक्यातील जलसंपदा विभागाने यापूर्वी तयार करून दिलेले पाझर तलाव, लघु पाटबंधारे तलाव, यांची संख्या कमी प्रमाणात असल्याने, व आहेत त्या गावातील तलाव खोली रुंदी अपुरी असल्याने पाणी साठा पुरेसा होत नाही, त्यामुळे पाझर तलावांचे नव्याने समाविष्ट करण्याची व तलावांचे फेर सर्वेक्षण करण्याची मागणी करण्यात आली आहे. खोर डोंबेवाडी, तलावात पाईप द्वारे पाणी साठा, व पुरवठा करण्यासाठी मोठी कसरत व संघर्ष करण्या पासून या गावांची कायम स्वरूपी थांबवावी अशी मागणी करत सरकार दरबारी खुलासा करीत, सभागृहाच्या निदर्शनास, अँड राहुल कुल यांनी आणून दिली आहे. तसेच या भागातील जिरायती शेती भागाचे फेरसर्वेक्षण करण्याची मागणी त्यांनी केली आहे, फेर सर्वेक्षण करताना आवश्यक असेल त्या ठिकाणी सुधारित पद्धतीने मान्यता देऊन जानाई शिरसाई,व पुरंदर सिंचन योजनेच्या पूर्वेच्या बाजूला असलेल्या ताम्हणवाडी पासून ते शेवटच्या जिरेगाव कौठडी पर्यंत ची सर्व कामे पूर्ण करून, विशेष बाब म्हणून हे तलाव जोडण्या संदर्भाचा निर्णय घ्यावा अशी मागणी केली.

यावर पाण्याची उपलब्धता पूर्णपणे तपासून पूर्ण योजनेचे फेर सर्वेक्षण करण्या बाबत महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरात लवकर या बाबत कार्यवाही केली जाईल असे त्यांनी सांगितले आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी