By : Polticalface Team ,05-11-2022
अहमदनगर : सत्तेचा हव्यास सोडून देशाचा विचार व्हायला हवं, सत्ता बळकावणे हा अजेंडा तयार झाला आहे. हे पाहता प्रधानमंत्र्यांनी सर्वांना सोबत घेऊन पुढे जायला हवे, मात्र सध्या तसे होत नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी प्रथमच पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शिर्डी येथे कार्यकर्ता मेळाव्याला आजारी असूनही शरद पवारांनी हजेरी लावली. घसा बसल्याने ते फक्त चारच मिनिटं बोलले. दरम्यान त्यांचं उर्वरित भाषण दिलीप वळसे पाटलांनी वाचून दाखवलं.
पवारांनी प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राजकीय हल्ला केला. धोरण, धर्मवाद, तंत्रांनाचा गैरवापर, महागाई यामुद्यावर मोदींवर घणाघाती टीका त्यांनी केली. ते म्हणाले, कमजोर अर्थव्यवस्था आणि महागाईकडे पंतप्रधानांनी लक्ष द्यायला हवे. केंद्राने राज्याचा मान राखायला हवा, पण तो राखला जात नाही. केंद्रीय यंत्रणांचा वापर करून सत्ता हस्तगत केली गेली. सध्या ईडी, सीबीआय आणि आयकरचा मोठा गैरवापर होतो आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
राज्यातले प्रकल्प परराज्यात जाणे ही लाजिरवाणी गोष्ट आहे, अशी खंत देखील त्यांनी बोलून दाखवली. विकास घडवायचा असेल तर मर्यादित विचार होऊ नये, जात धर्म यापलीकडे जाऊन विचार व्हावा. मात्र राज्यातल्या सत्ताधारी यांचा विचार संकुचित आहे. 2014 नंतर देशात काय सुरू झालं? हे देश अनुभवतोय. त्यामुळे सांप्रदायिक शक्तीना पराभूत केल्याशिवाय देशाचा विकास होऊ शकत नाही, असं देखील त्यांनी सांगितलं.
पवार म्हणाले की, उपचारानंतर दहा ते पंधरा दिवसांमध्ये मी पुन्हा नियमित कामाला लागणार आहे. सध्या तब्येत ठीक नाही. त्यामुळे जास्त बोलू शकत नाही वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.