By : Polticalface Team ,07-11-2022
यावेळी देण्यात आलेल्या निवेदनानुसार तालुक्यातील पारधी भिल्ल वंचित अनाथ, दलित, आदिवासी, भटक्या विमुक्त मुलांसाठी महाराष्ट्र शासनाच्या गट नं. ४५१ मधील जमिनीत आदिवासी पारधी संघटनेच्या वतीने स्वखर्चाने निवासी आश्रम शाळा व वसतिगृह बांधण्यात येणार असून त्यास महसूल विभागाने मंजुरी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यापूर्वी सदरील शासकीय जमिनीपैकी सांस्कृतिक भवनासाठी ४० आर जागेची मागणी केलेली असून उर्वरित १५ आर जागा शाळा वसतिगृहसाठी तातडीने मंजूर करण्यात यावी या मागणीसाठी सोमवार दि. १४ नोव्हेंबर रोजी श्रीगोंदा तहसिल कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अजित भोसले यांनी यावेळी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. वाचक क्रमांक :