By : Polticalface Team ,07-11-2022
भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांच्यासोबत लोक जोडले जात आहेत. राहुल गांधी यांच्यासोबत देशातील जनता आहे. जनतेच्या साथीने राहुल गांधी मजल गाठतील असाही विश्वास जिल्हा अध्यक्ष वाबळे यांनी व्यक्त करत महाराष्ट्रात काँग्रेसमय वातावरण निर्माण झाले असल्याचे म्हटले आहे .राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसची भारत जोडो यात्रा कन्याकुमारी ते श्रीनगर असा 3500 किमीचा प्रवास करणार आहे.कन्याकुमारी ,तामिळनाडू ,कर्नाटक असा प्रवास केल्यानंतर ही पदयात्रा आज (सोमवार)महाराष्ट्रात दाखल होणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजता राहुल गांधी मशाल घेऊन नांदेडमध्ये येणार आहे. भारत जोडो यात्रेचा 14 दिवस महाराष्ट्रात मुक्काम असेल.
अहमदनगर जिल्ह्यातील १००० युवक विधीमंडळ पक्षनेते माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि युवक नेते सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वाख़ाली भारत जोड़ो साठी जाणार आहेत.महाराष्ट्रात पदयात्रेचे एकूण १३ मुक्काम असून त्यापैकी नांदेड जिल्ह्यात ४, हिंगोली जिल्ह्यात ४, वाशिम जिल्ह्यात १. बुलढाणा ३ व अकोला १ असे मुक्काम असणार आहेत. वाचक क्रमांक :