By : Polticalface Team ,07-11-2022
श्रीगोंदा तालुका वाळू उपशाबाबतीत जिल्ह्यात प्रसिद्ध आहे वाळू तस्कर वाळू तस्करी करण्यासाठी तहसीलदार व पोलीस अधिकारी यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी वाळु माफियांचे पंटर चौकाचौकात बसुन एकमेकांना खबर देतात . यामुळे अवैध वाळुची वहातुक शहरातुन सुरळीत पणे तालुक्यात होत असते.
अहमदनगर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी राधाकृष्ण विखे पाटील व पोलीस अधीक्षक राकेश ओला हजर झाल्यापासून वाळू तस्करीला आळा बसला आहे श्रीगोंदा तालुक्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांचा सुद्धा श्रीगोंदा तालुक्यात अवैध धंदे व वाळू तस्करांनी धसका घेतला आहे. अल्पावधीमध्ये श्रीमंत होण्याच्या लालसेपोटी वाळु माफियांची संख्या दिवसेंदिवस वाढु लागलेली आहे. नवीन तरुण मुले वाळू तस्करीकडे वळु लागली आहेत. त्यातूनच गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात उदयास आली आहे. परंतु पोलीस निरीक्षक रामराव ढिकले श्रीगोंद्यात आल्यापासून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी नष्ट केली आहे. वाचक क्रमांक :