By : Polticalface Team ,10-11-2022
अफजल खानच्या कबरीजवळ अतिक्रमण हटवावे, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून सुरु होती. यातच कबरीजवळील बेकायदेशीर बांधकामांचा मुद्दा नेहमीच वादग्रस्त राहिला आहे. त्यावरून अनेकदा आंदोलने ही झाले. या परिसरात नेहमी पोलीस बंदोबस्त तैनात असतो.
दरम्यान आज पहाटे साडेपाचच्या सुमारास अफजलखानाच्या कबरी भोवतीची अतिक्रमणे पाडण्यास सुरुवात करण्यात आली. परिसरात कडक बंदोबस्त असून, कबरीच्या परिसरातील रस्ता बंद करण्यात आलेला आहे. आजच्या कारवाईबाबत प्रशासनाकडून अत्यंत गोपनीयता ठेवण्यात आली होती.
काय आहे कबरीचा इतिहास १० नोव्हेंबर १६५९ या तारखेला छत्रपती शिवरायांनी प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाचा वध केला होता. नुकतेच या ऐतिहासिक घटनेला ३६३ वर्षे पूर्ण झाली. या दिवसाचे महत्व पाहता शासनाच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने आज प्रतापगडाच्या पायथ्याशी असणारी अफजलखान याच्या कबर परिसरातील अनधिकृत बांधकाम जमीन दोस्त करण्यास सुरवात केली आहे.
अनुचित प्रकार घडू नये व दक्षतेसाठी या परिसरात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. तेथे कोणालाही जाण्यास परवानगी दिली जात नाही. ही कारवाई चोख पोलिस बंदोबस्तात सु्रू असून त्यासाठी चार जिल्ह्यातील दीड हजार पोलिस बंदोबस्तासाठी तैनात केले आहेत वाचक क्रमांक :