महिलांनी कोणते कपडे परिधान करावे हे रस्त्यावरचे मवाली ठरवू लागले

By : Polticalface Team ,11-11-2022

महिलांनी कोणते कपडे परिधान करावे हे रस्त्यावरचे मवाली ठरवू लागले मुंबई : राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आली आहे. या निमित्ताने आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर चांगलीच कडाडून टीका केली आहे. आज बळीराजा पंतप्रधानांना इच्छा मरणाची परवानगी मागतोय, नव्या भारतात आज महिलांनी कोणते कपडे परिधान करावेत हे रस्त्यावरचे काही मवाली ठरवू लागले. आज संविधानाला आपल्या मनाप्रमाणे वाकवण्याचे मनसुंबे काही लोकांच्या मनामध्ये आहे. अशा शब्दात जयंत पाटील यांनी कोणाचेही नाव न घेता सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला.
भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात पाटील म्हणाले, भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने मी एका अत्यंत ऐतिहासिक क्षणाचा आज साक्षीदार झालो. कॉंग्रेसचे नेते मा. खा. राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या या यात्रेस मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमचे नेते शरद पवार यांच्यावतीने पाठिंबा देतो. राहुलजी गांधी हे फक्त चालत नाही आहेत, तर पळतही आहेत. त्यामुळे काँग्रेसचा सुवर्ण काळ येणार हे निश्चित आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

तसेच पुढे बोलताना पाटील म्हणाले, देशाच्या पहिल्या पंतप्राधनांवर चिखलफेक करण्याचे काम काहीजण करतायत. जनता हे बघतेय, नोटबंदीच्या निर्णयाला एका दिवसात परवानगी मिळते व पंतप्रधान रात्रीतून घोषणा करताय. त्यानंतर नोटा बदलीसाठी लोक रांगेत थांबली व यातच त्यांचा मृत्य झाला. हे जनता कधीही विसरणार नाही.

एकदा बराक ओबामा असं म्हणाले होते कि WHEN MANMOHAN SINGH TALKS THE WORLD LISTENS या देशाच्या पंतप्रधानांचा इतका गौरव पूर्ण उल्लेख केला गेला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा कॉंग्रेसचा भाऊ आहे, कायमच आम्ही कॉंग्रेसच्या विचार आणि कृतीला साथ देऊ, आणि आपण एकजुटीने काम करणार आहोत, असे जयंत पाटील म्हणाले.

या देशात अनेक ऐतिहासिक पदयात्रा निघाल्या आहेत. उचललेस तू मीठ चिमुटभर, साम्राज्याचा खचला पाया... गांधीजींनी दांडी यात्रा काढली आणि स्वातंत्र्याची ठिणगी देशभर पसरली होती. महाराष्ट्र कायम परिवर्तनाला साथ देणारी भूमी आहे. इतिहास साक्षी आहे. त्यामुळे या भारत जोडो यात्रेलाही हा महाराष्ट्र मनापासून साथ देणार.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष