महिलांनी कोणते कपडे परिधान करावे हे रस्त्यावरचे मवाली ठरवू लागले
By : Polticalface Team ,11-11-2022
मुंबई : राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आली आहे. या निमित्ताने आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर चांगलीच कडाडून टीका केली आहे. आज बळीराजा पंतप्रधानांना इच्छा मरणाची परवानगी मागतोय, नव्या भारतात आज महिलांनी कोणते कपडे परिधान करावेत हे रस्त्यावरचे काही मवाली ठरवू लागले. आज संविधानाला आपल्या मनाप्रमाणे वाकवण्याचे मनसुंबे काही लोकांच्या मनामध्ये आहे. अशा शब्दात जयंत पाटील यांनी कोणाचेही नाव न घेता सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला.
भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात पाटील म्हणाले, भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने मी एका अत्यंत ऐतिहासिक क्षणाचा आज साक्षीदार झालो. कॉंग्रेसचे नेते मा. खा. राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या या यात्रेस मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमचे नेते शरद पवार यांच्यावतीने पाठिंबा देतो. राहुलजी गांधी हे फक्त चालत नाही आहेत, तर पळतही आहेत. त्यामुळे काँग्रेसचा सुवर्ण काळ येणार हे निश्चित आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला.
तसेच पुढे बोलताना पाटील म्हणाले, देशाच्या पहिल्या पंतप्राधनांवर चिखलफेक करण्याचे काम काहीजण करतायत. जनता हे बघतेय, नोटबंदीच्या निर्णयाला एका दिवसात परवानगी मिळते व पंतप्रधान रात्रीतून घोषणा करताय. त्यानंतर नोटा बदलीसाठी लोक रांगेत थांबली व यातच त्यांचा मृत्य झाला. हे जनता कधीही विसरणार नाही.
एकदा बराक ओबामा असं म्हणाले होते कि WHEN MANMOHAN SINGH TALKS THE WORLD LISTENS या देशाच्या पंतप्रधानांचा इतका गौरव पूर्ण उल्लेख केला गेला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा कॉंग्रेसचा भाऊ आहे, कायमच आम्ही कॉंग्रेसच्या विचार आणि कृतीला साथ देऊ, आणि आपण एकजुटीने काम करणार आहोत, असे जयंत पाटील म्हणाले.
या देशात अनेक ऐतिहासिक पदयात्रा निघाल्या आहेत. उचललेस तू मीठ चिमुटभर, साम्राज्याचा खचला पाया... गांधीजींनी दांडी यात्रा काढली आणि स्वातंत्र्याची ठिणगी देशभर पसरली होती. महाराष्ट्र कायम परिवर्तनाला साथ देणारी भूमी आहे. इतिहास साक्षी आहे. त्यामुळे या भारत जोडो यात्रेलाही हा महाराष्ट्र मनापासून साथ देणार.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी