मौर्य क्रांती महासंघाचे पहिले राज्य अधिवेशन आणि चौथी धनगर जागृती परिषद जेजुरी येथे उत्साहात संपन्न

By : Polticalface Team ,12-11-2022

मौर्य क्रांती महासंघाचे
पहिले राज्य अधिवेशन
आणि 
चौथी धनगर जागृती परिषद
जेजुरी येथे उत्साहात संपन्न प्रतिनिधी अमोल गायकवाड : जेजुरी या ऐतिहासिक ठिकाणी 8नोव्हेंबर 2022रोजी मौर्य क्रांती महासंघाचे पहिले राज्य अधिवेशन आणि चौथ्या धनगर जागृती परिषदेचे आयोजन करण्यात आले.राज्य भरातून धनगर आणि बहुजन बांधव या परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित होते. जेजुरी गडावर जाऊन राजमाता अहिल्यामाई होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करत, मौर्य क्रांती महासंघाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते समाज बांधवांनी क्रांतीची मशाल पेटवून धनगर समाज मनाला जागृत करण्याचा संकल्प केला. यावेळी जेजुरी गडावर परिषदेचे उदघाटक इंजि. शिवाजीराव शेंडगे,संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बलभीम माथेले(परभणी )प्रदेश अध्यक्ष राजीव हाके(धुळे )यांच्या प्रमुख उपस्थितीत जेजुरी गडावरून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली.ही गडावरून निघालेली मिरवणूक जेजुरीत लक्षवेढी ठरली.

सकाळी ठीक दहा वाजता ढोल गर्जना करत जय मल्हार सांस्कृतिक भवन येथे मिरवणुनिकीची सांगता करण्यात आली. ठीक दहा वाजता पारंपरिक गजी धनगरी ढोल वादन, सुंभरांन आणि चांगभलंचा जयघोष करत शाहीर सागर माने आणि पथका च्या पहाडी आवाजाने परिषदेला उत्साहात सुरुवात झाली.

मौर्य क्रांती महासंघाचे जेष्ठ मार्गदर्शक इंजि. शिवाजीराव शेंडगे (सांगली )यांच्या अभ्यासपूर्ण उदघाटनपर भाषणाने परिषदेला वैचारिक अधिष्ठान प्राप्त करून दिले.मरगळ आलेल्या धनगर समाजात एक चैतन्य निर्माण करणारं करत, हे एक वैचारिक केडर बेस संघटन असल्याचे ते म्हणाले. सर्व जातींची जातनिहाय जनगणना का? व कशासाठी? संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व दिल्याने, सर्व जातींची प्रगती होणे शक्य आहे.

एकट्याने नव्हे तर एकीने लढावे लागेल, त्या शिवाय पर्याय नाही. आदी विषयांवर या परिषदेत सखोल चिंतन करण्यात आले. बलभीम माथेले यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या परिषदेला संबोधित करताना राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करणारे कमलकांत काळे यांनी पत्रिकेतील विषयांवर मत व्यक्त करतांना, खंडोबा ही समस्त धनगर आणि बहुजन समाजाला जोडणारी विरासत आहे. येथूनच महात्मा फुलेनी प्रेरणा घेतली व सत्य शोधक समाजाची स्थापना केली असल्याचे स्पष्ट करत .धनगर बहुजन समाजाच्या वर्तमान स्थितीवर भाष्य केले. समाजातील खरे खोटे मुखवटे, नेतृत्व यांच्यातील फरक समाज बांधवांनी वेळीच ओळखवा व संघटित होऊन, समाजाला दिशा देण्याचे आवाहन केले.तसेच धनगर समाजाने पुढे येऊन मौर्य क्रांती महासंघाच्या माध्यमातुन बहुजन समाजाला जोडण्याचे काम करावे.अशी साद घातली.

दोन सत्रात झालेल्या या परिषदेला मौर्य क्रांती महासंघाचे राज्य प्रभारी उत्तम भाई कोळेकर,(पालघर)राज्य आणि विभागीय पदाधिकारी तुकाराम जानकर (सातारा ), प्रकाश कुटे (वाशीम )किरण मासुळे, जी. के. सूर्यवंशी (khandes)सत्यवान दुधाळ (सोलापूर )गोपीचंद वडितके, सुभाष येळे (कोकण ) डॉ.दत्ता भरणे, डॉ. प्रशांत साळवे, डॉ. प्रवीण जगताप, मनोहर कोकरे (प. महाराष्ट्र )विजय वसतकर (बुलढाणा )यांची विशेष उपस्थिती लाभली.

दुसऱ्या सत्रात. सत्यशोधक विचारवंत गोविंदराम शूरनर यांना मारोतीराव पिसाळ मामा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पहिला सत्यशोधक प्रबोधनकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. खुल्या राज्यस्तरीय काव्य वाचन स्पर्धेच्या विजेत्या तीन स्पर्धाकांचा त्यात कवी बालाजी भागानगरे, कवी रणजित मालगे, गीतांजली पाटील यांना रोख पारितोषिक आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले. यावेळी सत्यशोधक पद्धतीने विवाह बद्ध आदर्श जोडप्यांचा सन्मान करण्यात आला. वाघर चित्रपटातील मुख्य अभिनेत्री, इतर कलावंत आणि चित्रपट निर्माते राजेंद्र बरकुडे कुटुंबाला सन्मानित करण्यात आले. यावेळी धनगर टाइम्स या वृतपत्राचे, गोविंद शूरनर लिखित बहुजनांचे प्रबोधन व सत्य शोधक विचारवंत संचित धनवे लिखित महानायक खंडोबा या ग्रंथाच्या मुखपृष्ठचे देखील प्रकाशन करण्यात आले. यावेळी बलुतेदार महासंघाचे कल्याणराव दळे, ओबीसी राज्य संघटक मुबारक नदाफ, तुकाराम माळी मुंबई महापालिका पूर्व आयुक्त लक्ष्मण व्हटकर, धनगर महासंघाचे प्रदेश अध्यक्ष अंकुश निर्मळ, धनगर महासंघाचे प्रवीण काकडे, शेगर महासंघाचे सुनील भगत, पत्रकार रमेश लेंडे, क्रांती संघटनेचे पी. बी. कोकरे,, युवा मल्हार सेनेच्या धनश्री आजगे, अडव्होकेट जोतिबा पिसाळ, आनंदा होनमाने (बेळगाव )मल्हार आर्मीचे राहुल मदने यांची अभ्यास पूर्ण भाषणे झाली

यावेळी इतिहास संशोधक संचित धनवे यांनी महानायक खंडोबा यांच्या संघर्षाची गाथा मांडत, खंडोबा आमचा प्रेरणा पुरुष असल्याचे आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून स्पष्ट केले..अध्यक्षता करताना बलभीम माथेले यांनी संघटन शक्ती आणि समाजाच्या सद्य स्थिती वर भाष्य करत एकट्याने नव्हे तर समाजातील सर्व संघटनांचं नेतृत्व करणाऱ्या बुद्धिजीवी समाज बांधवांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त करत,, एकट्याने नव्हे तर एकीने लढण्याचे उपस्थित बांधवांना आवाहन केले.

यावेळी जेजुरी येथील नगर सेवक संपत कोळेकर, देवस्थानचे विश्वस्थ संदीप जगताप, यशवंत पडळकर,संतोष खोमणे, मोहन खोमणे,अशोक बरकडे,शिवाजी पिसे,, गणेश कोळपे यांची आणि जेजुरी परिसरातील मान्यवर समाज बांधव याचे विशेष सहकार्य लाभले. प्रास्तविकातून राज्य प्रभारी उत्तम कोळेकर यांनी संघटनेचे ध्येय धोरण स्पष्ट करत,समाज भान जागृत करणारी ही ऐतिहासिक परिषद असल्याचे स्पष्ट केले.तर संघटनेचे प्रदेश अध्यक्ष राजीव हाके यांनी आपल्या खास बहारदार शैलीतून परिषदेत रंगत आणली.या धनगर जागृती परिषदेच्या निमित्ताने समाजाच्या ज्वलत प्रश्नांवर फार गंभीर चर्चा झाली. धनगर समाज मनाला अंतरबाह्य खडबडून जाग आणणारी ही परिषद खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरल्याचे मत यावेळी राज्य भरातील समाज बांधवांनी व्यक्त केले येथून खऱ्या अर्थाने धनगर समाज जागृतीचे रणशिंग फुंकले गेल्याचे समाधान घेऊन समाज बांधव परतले.

परिषदेच्या यशस्वीते साठी गुरु गोविंद सोन्नर,शैला नवघरे,इंजि. सूर्यकांत पुजारी, शिवाजी वैद्य,सुरेश शिंदे, चंद्रकांत बंडगर,, सुभाष शेंगुळे हनुमंत दवंडे,निलेश बनकर, राम पिसाळ,कालिदास चोरमले, प्रा. रंगराव गढरीं,श्रीकृष्ण डुबे, अनिल हाके, प्रकाश माने,रविंद्र बंडगर, दिवाकर कुकडे, सचिन धायगुडे आणि असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी दिवस रात्र मेहनत घेऊन परिषद यशस्वी केली.. यावेळी झालेल्या विशेष मुलाखतीत प्रदेश अध्यक्ष राजीव हाके यांनी मौर्य क्रांती महासंघाच्या आगामी वाटचाली विषयी माहिती देतांना, सलग दहा वर्ष जेजुरी येथेच दर वर्षी परिषद होणार असल्याचे सुतोवाच केले. मौर्य क्रांती महासंघ हे पूर्णतः सामाजिक आणि सांस्कृतिक संघटन असून, ते एक केडर बेस संघटन असून, समाजाच्या आणि कार्यकर्त्याच्या कष्टाच्या पैशातून उभे राहिलेले संघटन असल्याचे नमूद केले.यावेळी मौर्य क्रांती महासंघाच्या बुक स्टॉल वरून मोठया प्रमाणात समाज बांधवांनी पुस्तके खरेदी केली.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी