उपमुख्यमंत्र्यांची संवेदनशिलता, कुवेतमध्ये अडकलेला विद्यार्थी सुखरुप परतला; आमदार उमा खापरेंच्या प्रयत्नांना यश

By : Polticalface Team ,13-11-2022

उपमुख्यमंत्र्यांची संवेदनशिलता, कुवेतमध्ये अडकलेला विद्यार्थी सुखरुप परतला; आमदार उमा खापरेंच्या प्रयत्नांना यश सातारा : लोकांच्या समस्यांवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशिलतेचं उदाहरण समोर आलंय. आमदार उमा खापरे यांच्या पाठपुराव्याची दखल घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधल्यानं कुवेतमध्ये अडचणीत सापडलेल्या कराडमधील तरुणाची सुटका होऊ शकली.

कुवेतमध्ये एक तरुण अडकल्याची माहिती आमदार खापरे यांच्याकडून मिळाल्यावर उपमुख्यमंत्र्यांनी तातडीनं सूचना दिल्या. त्यांच्या दिल्ली येथील कार्यालयानं तत्परता दाखवत या तरुणाची सुटका होऊ शकली. सागर सुभाष संकपाळ (वय 28, रा. विजयनगर, कराड, जि. सातारा) हा तरुण कुवेत (दुबई) येथे जादा पगाराच्या अमिषानं कामासाठी गेला होता. सुमारे दीड महिना काम करुनही त्याला व्यवस्थित वेतन मिळाले नाही. त्याची तेथे दयनीय अवस्था झाली. कंपनीतील अधिकाऱ्यांना मायदेशी सोडण्याची मागणी केली. त्यांनी उलट त्याचा पासपोर्ट व मोबाईल जप्त केला.

भाजपाच्या आमदार उमा खापरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहाय्यानं केंद्रीय विदेश मंत्रालयाशी तात्काळ पत्रव्यवहार केल्यानं सागरची 10 दिवसात सुखरुप सुटका झाली आणि तो मायदेशी परतला. आमदार उमा खापरे आणि सागरच्या कुटुंबियांनी उपमुख्यमंत्र्यांसोबतच त्यांचे दिल्ली येथील स्वीय सहायक मनोज मुंडे यांनी केलेल्या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.

सागर व त्याची सुटका करण्यासाठी धावपळ करणारे त्याचे बंधू रोहित यांच्यासह आमदार खापरे यांनी झालेल्या प्रकाराची माहिती पत्रकार परिषदेत दिली. सागर संकपाळचं आयटीआयचं शिक्षण झालं असून तो सीएनसी बेन्डींग ऑपरेटरचं काम करतो. 42 हजार पगाराचं अमिष दिल्यानं सागरने नोकरी डॉट कॉमवर अर्ज करुन नाशिक येथील एका एजन्सीच्या माध्यमातून कुवेत येथे नोकरीसाठी 15 सप्टेंबर 2022 रोजी गेला. सागरने 16 सप्टेंबरपासून ‘दकील अलजेसर’ कंपनीत काम सुरु केले.

सागर म्हणाला की, तो सहकाऱ्याबरोबर स्वयंपाक करुन जेवायचा. परंतु त्याला खाण्याच्या पदार्थातून काही तरी दिले जात असल्याची शंका आली. अस्वस्थ वाटू लागल्यावर त्याने कंपनीत अधिकाऱ्यांकडं मायदेशी परत सोडण्याची मागणी केल्यावर आपला पासपोर्ट व मोबाईल जप्त करण्यात आला.

आपण दीड महिना काम केलं असताना 15 दिवसांचाच पगार दिला. सागरवर शारिरीक अत्याचार करुन खोालीतून हाकलून दिले. त्यामुळं आपली मानसिक स्थिती बिघडल्याचं सागरनं सांगितलं. आपण बंधू रोहित यांच्या मी संपर्कात होतो. सागरचा मोबाईल लागत नसल्यानं १९ सप्टेंबरला बंधू रोहितनं प्रथम एजन्सीशी संपर्क साधला असता त्यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही. रोहित यांनी सागरच्या अन्य सहकाऱ्यांशी संपर्क साधला तेव्हा त्यांना सागरला बाहेर काढल्याची माहिती मिळाली. रोहितने भाजपाच्या आमदार उमा खापरे यांचा मुलगा जयदीप याच्याशी संपर्क साधला. त्यानंतर खापरे यांनी विलंब न लावता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून विदेश मंत्रालयाशी पत्रव्यवहार केला.

खापरे यांनी वारंवार पत्रव्यवहाराचा पाठपुरावा केला. केंद्रीय विदेश मंत्रालयानं खापरे यांच्या पाठपुराव्याची दखल घेत सागरला मायदेशी परत आणण्याची व्यवस्था केली. याबाबत उमा खापरे म्हणाल्या की, मी प्रथम उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलले. त्यांनी तात्काळ त्यांच्या दिल्लीतील स्वीय सहायक मनोज मुंडे यांना संपर्क साधून विदेश मंत्रालयाशी पत्रव्यवहार करण्यास सांगितला. आम्ही तात्काळ 1 नोव्हेंबरला पत्रव्यवहार केला. पाठपुरावा केल्यानं त्याची सुखरुप सुटका झाली

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष

गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम

१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.

अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.

‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये

"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं

मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.

यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न

यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त

वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड

चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.