भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोशनचे प्रांतअधिकाऱ्यांना निवेदन.श्रीगोंदा तहसील कार्यालयसमोर17 नोव्हें 2022 रोजी आंदोलनाचा इशारा
By : Polticalface Team ,15-11-2022
श्रीगोंदा प्रतिनिधी ;
उच्च न्यायालय मंबई यांनी नुकतेच गायराण जमिनीवरील अतिक्रमण काढण्याचे आदेश काढले आहेत तो महाराष्ट्र शासनाने स्वतः रेव्हिएव फेटिशन दाखल करून संबंधित आदेश रद्द करून गोरगरीब जनतेला उघड्यावर येण्यापासून वाचवावे याबाबतचे निवेदन भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोशने प्रांताधिकारी सुधाकर भोसले , तहसीलदार मिलिंद कुलथे , पोलीस निरीक्षक रामराव ढिकले व गटविकास अधिकारी रामकृष्ण जगताप यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात असे म्हटले आहे कि तालुक्यातील अनेक गावामध्ये बऱ्याच कटुबांनी पिढ्यानपिढ्या गायरान जागेवर कच्ची पक्की घरे बांधल्याली आहे . याठिकाणी राहणारे अनेक कुटुंब हे भूमिहीन , भटके , विमुक्त , दलित , गोरगरीब समाज आहे ते दररोज मोलमजुरी करून स्वतःचा व कुटुंबाचा उदरनिवाह करतात. मानवाच्या मूलभूत गरजेपैकी निवारा हा महत्वाची गरज आहे तालुक्यातील जवळपास सर्वच घरे लोकांनी आपल्या केलेल्या कष्टाच्या कमाईच्या बचतीतून बाधलेली आहेत. त्या ठिकाणची घरपट्टी, पाणीपट्टी, वीजबिले वर्षानुवर्षे नियमित भरत आहे. जर लोकांना घरे बांधायला असती तर त्यांनी गायरानामध्ये घरे बांधलीच नसती त्यांनी त्यांचा प्रपंच असा उघड्यावर कशाला चालवला असता. सरकारचे धोरण प्रत्येकाला घरे मिळावे हे आहे परंतु ते घरे बांधण्यासाठी जागाच नाही . तर घर बांधणार तरी कोठे? या शासनाने स्वतः विचार करायला पाहिजे. बांधलेली घरेही बऱ्याच प्रमाणात शासनाकडून आलेली घरकुल व इतर योजनेतून आलेली आहे. त्या जागेमध्ये बराच निधी वापरला गेला आहे . त्यामध्ये सिमेंटी रस्ते, गटार लाईन, पिण्याच्या पाण्याची नळ योजना , मोठमोठे हायमॅक्स यावरती बराच निधी शासनाने खर्च केला आहे. महाराष्ट्र सरकारच्या पडीक गायरान जमिनीवर निवासी प्रयोजनासाठी अतिक्रमण धारकांना मालकी हक्क देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी त्यांच्या हिताची भूमिका घेतली आहे परंतु महसुली कर्मचाऱ्यांच्या उदासीनमुळे आणि राजकीय हस्तक्षेपामुळे गोरगरीब जनतेला आतापर्यंत न्याय मिळू शकला नाही.
सदर अतिक्रमण जरी गायरान जागेतील असले तरी ज्या प्रयोजनाकरिता राखून ठेवल्याल्या आहेत त्याकरिता वापर किती प्रमाणात केला जातो? त्याची खरोखर गरज आहे का? याचा देखील विचार शासनाने करावा.
तसेच ही घरे शासनाने नियमानुकूल करून देण्यात यावी योग्य तो सकारात्मक निर्णय तातडीने घ्यावा अन्यथा भ्रष्टाचार विरोधी संघटना महाराष्ट्र राज्य सर्व पदाधिकारी यांचे नेतृत्वाखाली दिनांक 17 नोव्हें 2022 रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालय समोर सांगवी दुमाला गावातील सर्व ग्रामस्थ व श्रीगोंदा तालुक्यातील सर्व जनते सोबत आंदोलन करणार असल्याची निवेदनात म्हटले आहे .
यावेळी भ्रष्टाचार विरोधी संघटना महाराष्ट्र राज्य पदाधिकारी, सांगवी ग्रामस्थांसह श्रीगोंदा तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी