गायरान जमीन अतिक्रमण हटवणे बाबत शासनाने तातडीने न्यायालयाच्या आदेशा बाबत फिर विचार याचिका दाखल करावी माजी आमदार नारायण आबा पाटील यांची मागणी

By : Polticalface Team ,19-11-2022

गायरान जमीन अतिक्रमण हटवणे बाबत शासनाने तातडीने न्यायालयाच्या आदेशा बाबत फिर  विचार याचिका दाखल करावी माजी आमदार नारायण आबा पाटील यांची मागणी करमाळा प्रतिनिधी गायरान जमीन अतिक्रमण हटवणे गरीबांना उध्वस्त करणारे असून शासनाने तातडीने न्यायालयाच्या आदेशाबाबत फेरविचार याचिका दाखल करावी, अशी मागणी माजी आमदार नारायण पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे केली आहे. सध्या सर्वत्र गायरान अतिक्रमण हटवण्याच्या हालचाली सुरु झाल्याने सर्वसामान्य लाभार्थी नागरिक चिंतेत पडल्याने करमाळा मतदार संघातून न्यायालयाच्या आदेशाचा फेरविचार करावा अन्यथा गोरगरीब नागरिकांच्या भवितव्य व अस्तित्वासाठी जन आंदोलन करण्यास तयार असल्याची भुमिका माजी आमदार नारायण पाटील यांनी घेतली आहे. याबाबत अधिक माहिती देताना पाटील यांनी सांगितले की गेली अनेक दशके प्रत्येक गावखेड्यातील गरीब नागरीक हा स्थानिक ग्रामपंचायत वा पंचायत समिती यांनी दिलेल्या गायरानाच्या जागांवर आपली घरे बांधून वास्तव्य करत आहे. शासनानेच विविध लाभयोजनातून घरकुले देऊन गरीब लाभार्थीना राहण्याची सोय करुन दिल्याने आता अचानक त्याच प्रशासनाकडून घरे पाडली जाणे अन्यायकारक असुन न्यायालयाचा हा आदेश जनसामान्यांच्या अन्न, वस्त्र व निवारा या मुलभुत सुविधांमधील निवारा उध्वस्त करणारा असा आहे. वास्तविक पाहता या गायरान जागांवर अनेक ठिकाणी शासकीय कार्यालये, प्राथमिक शाळा, ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्र यासह मंदिरे, मशीदी आदि अनेक वर्षांपासून उभ्या आहेत. यामुळे जनमाणसांच्या आरोग्य व शिक्षण सुविधांबाबतही अशी अतिक्रमणे पाडल्याने बाधा येऊ शकते. तसेच मंदिर व मशीद हा श्रध्देशी निगडीत विषय असल्याने याबाबतही शासनाने जनभावना जाणून घ्याव्यात.मुख्यमंत्री महोदयांनी याबाबत फेरविचार याचिका दाखल करुन अनेकांना बेघर करणार्‍या या समस्येवर उपाय काढावा अशी आग्रही मागणी आपण निवेदनाद्वारे केली असल्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी सांगितले. तर सध्या गायरान जमिनीवरील अतिक्रमण करणार्‍या लोकांना याबाबत नोटीस देण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. सर्वसामान्य नोटीस धारकांनी हतबल न होता नोटीशीसह जेऊर येथे आमदार कार्यालयाशी संपर्क साधावा. माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी एकत्रित विचार विनिमय करुन पुढील कायदेशीर अथवा वेळ पडल्यास शांततेच्या मार्गाने जन आंदोलन करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.यावेळी जि प सदस्य बिभीषण आवटे, सभापती अतूल पाटील, उपसभापती गणेश चौधरी तसेच विविध गावचे प्रतिनिधी उपस्थित होते.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी