डॉ . अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली श्रीगोंदा तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा.
                      
                
            
               By : Polticalface Team ,19-11-2022
       
               
                           
              शासनाने अतिक्रमण धारकांच्या बाजूने रिट पीटिशन दाखल करावी : अॅड . अरूण जाधव श्रीगोंद्यात आक्रोश मोर्चाद्वारे शासन दरबारी मांडल्या अतिक्रमण धारकांच्या वेदना उच्च न्यायालय मुंबई यांचे आदेशानुसार सरकारी गायरान जमिनीवरील अतिक्रमणे संदर्भाने गायरान धारक आणि निवासी भोगवटा यांच्या बाजूने अॅड . डॉ.अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली श्रीगोंदा तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून अतिक्रमण धारकांच्या वेदना शासन दरबारी मांडण्यात आल्या .  18-11-2022 या आक्रोश मोर्चात लोकाधिकार आंदोलन संघटनेचे जिल्हा समन्वयक संतोष भोसले , अनेक संस्था , संघटना , मंडळे , सचिन भिंगारदिवे , राजू शिंदे , संतोष चव्हाण सोनेगाव , साहभागी झाले होते . यावेळी लोक अधिकार आंदोलनाचे प्रवक्ते बापूसाहेब ओहोळ , प्रा . बळे सर , ज्योती भोसले , शिवाजी पोटे , राहुल साळवे , वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हाध्यक्ष संतोष जठार , तालुकाध्यक्ष संतोष जौंजल , यांनी मनोगत व्यक्त केली तर प्रसाद भिवसणे आनंदा पवार , संतोष पवार , प्रेरणा धेंडे, आसाराम काळे विलास काळे , शरद काळे , पल्लवी शेलार , छाया भोसले,मदने उज्वला जलिंदर शिंदे , बनकर सुनीता , लता सावंत , नरसिंग भोसले , सुरेश काळे , किसन बर्डे , भाऊ क्षीरसागर , थोरात मामा , सुभाष बर्डे , ससाणे अक्षय , मयूर दारातालुका दंडाधि भोसले , राजेंद्र राऊत,बापूसाहेब , प्रमोद काळे , अण्णासाहेब कोळपे ,  सुनिल ओहोळ , पिंटू भोसले , नवनाथ शिंदे , राजू मंडले प्रसाद भिवसने , आदी उपस्थित होते या प्रसंगी डॉ अरुण जाधव म्हणाले , सरकारी गायरान जमिनीवर मिळालेल्या मालकी हक्कामुळे अनेक दलित , आदिवासी , भटके विमुक्त भूमीहीन शेतमजूर , गोरगरीब , कष्टकरी या गायरान जमिनीवर घरे उभे केली व त्या जमिनीमध्ये पिके घेऊन व स्वतःची उपजीविका भागवत आहेत , तसेच सरकारी जागेवर निवासी प्रयोजनासाठी डॉ . अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली श्रीगोंदा तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढून तहसीलदार मिलिंद कुलथे यांना निवेदन देण्यात आले. अतिक्रमण धारक महाराष्ट्र शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या मिळालेल्या घरकुलाचाही उपभोग घेत आहेत . सरकारी गायरान जमिनीवरील अतिक्रमण धारकांना या जमिनी व्यतिरिक्त जगण्यासाठी ठोस साधन नाही . तसेच सरकारी जागेवर घर बांधून राहत असलेल्या परिवारांना ही या जागे व्यतिरिक्त राहण्यासाठी कोणतीही जागा नाही महाराष्ट्रातील शेती प्रयोजनासाठी जमीन विहित केलेली गायरान धारक आणि सरकारी जागेवर घरे बांधून राहत असलेले निवासी भोगवटादार यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा , या अतिक्रमण धारक जनतेने ऊस तोडून , वीटभट्टीच्या कामावर जाऊन मोलमजुरी करून कुटुंबाला निवारा मिळावा म्हणून परिस्थितीनुसार निवारा उभा केला आहे , तो उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशानुसार पाडण्यात येणार आहेत , असे अतिक्रमण लाभधारक जनतेस प्रशासनाकडून नोटीस दिल्यानंतर अतिक्रमण गायरान लाभधारक जनता चिंतेत पडली आहे , ही लोकं रात्रंदिवस विचार करू लागले आहे . माता - भगिनींच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले कोणी तर जेवण बंद केले आहे , असा धसका जनतेला बसला आहे . या गोरगरीब कष्टकरी , दलित आदिवासी जनतेचा प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी गायरान अतिक्रमण जनतेच्या वतीने अॅड डॉ अरुण जाधव यांच्या नेतृत्वाखाली श्रीगोंदा तहसीलदार मिलिंद कुलथे व पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांना निवेदन दिले आहे . महाराष्ट्र सरकारने या अतिक्रमणधारकांच्या बाजूने रिट पिटीशन याचीका सुप्रीम कोर्टात दाखल करावी हे सांगण्यात आले आहे यासाठी आज तहसील कार्यालयावरती जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता , सूत्रसंचालन राजेंद्र राऊत यांनी , तर आभार संतोष भोसले यांनी मानले .
              
              
वाचक क्रमांक :
                                    
                                    
                                                                   
                                                              
                                                              
                                    
                                        
                                          
                            
              							
							
							
							प्रकाश म्हस्के 
							संपादक 							
 
							
              
                
 
                
                
             		  	 							  
  स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
      
   
														  
  भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती  
  							  
  श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
  							  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
      
   
														  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
  							  
  कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 
  							  
  कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न 
      
   
														  
  त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी 
  							  
  श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला  भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
  							  
  दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
      
   
														  
  निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
  							  
  बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 
  							  
  लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना. 
      
   
														  
  पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे 
  							  
  पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट 
  							  
  दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
      
   
														  
  लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
  							  
  दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई 
  							  
  श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
      
   
														  
  श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष