एक दिवसाच्या आत वीज कनेक्शन पूर्ववत न जोडल्यास सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढणार- युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांचा इशारा!

By : Polticalface Team ,19-11-2022

एक दिवसाच्या आत वीज कनेक्शन पूर्ववत न जोडल्यास 
  सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढणार-  युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांचा इशारा! करमाळा प्रतिनिधी सक्तीच्या वीज बिल वसुली साठी महावितरण कडुन शेतकऱ्यांना पुर्व सुचना न देता सरसकट (डिपी) रोहित्र सोडवुण वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. आगोदरच ओल्या दुष्काळाने शेतकऱ्यांची खरीप पिके शेतातच सडुन गेली आहेत. त्याचे पंचनामे सुरु आहेत,रब्बी हंगाम वाया गेला आहे. शेतकरी अनुदानाच्या प्रतिक्षेत आहे आशा परस्थीत ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी ओल्या दुष्काळाने भरडलेल्या शेतकऱ्यांची वीज कट करुन शिंदे -फडणवीस सरकार शेतकऱ्यांची कृर चेष्टा करत असुन एक दिवसाच्या आत वीज कनेक्शन पूर्ववत नाही केले तर युवासेनेच्या वतीने सरकारची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून पुतळे दहन केले जातील असा इशारा युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी दिला आहे. या निवेदनात फरतडे यांनी म्हटले आहे की ओल्या दुष्काळा बरोबर मुक्या जनावरांना लंपी आजार झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला, अनेकांचे पशुधन दगावले तर अनेकांचा उपचारांसाठी हजारो रुपय खर्च झाला आहे. महाविकास आघाडी सरकार असताना देखील वीज कनेक्शन कट करण्यात येत होते त्यावेळेस विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे आम्ही शेतकऱ्यांचे कनेक्शन कधीच कट केले नाही असे सांगून महाविकास आघाडी सरकार वर टिका करत होते .आज ते सत्तेत आहेत व विशेष म्हणजे करोडो रुपय खर्चून अनेक आमदारांना चार्टर्ड प्लेन ने सुरत गुवाहाटी येथे फिरवून त्यांनी सरकार स्थापन केले आहे. सरकार स्थापन करण्यात जेवढा खर्च झाला असेल तेवढ्यात शेतकऱ्यांचे वीजबिल माफ झाले असते परंतु विरोधात असताना आंदोलनाची भाषा आणी सत्तेत आल्यानंतर सक्तीने वसुली हे दुटप्पी पणाचे लक्षण आहे. गेल्या वर्षी महाविकास आघाडी सरकार असताना मार्च महिन्यात वीज कनेक्शन कट केल्यानंतर शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी तिन महिने मुदत वाढ देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला होता .त्यावेळेस विरोधी पक्ष नेते असलेले देवेंद्र फडणवीस अधिवेशनात सरकारवर हल्लाबोल करत होते ते आज उपमुख्यमंत्री आहेत व खऱ्या अर्थाने तेच सरकार चालवत आहेत मग आज ते गप्प का आहेत असा सवाल देखील युवासेनेकडुन उपस्थित करण्यात आला आहे. या निवेदनात शेवटी फरतडे यांनी म्हटले आहे की सध्या उसतोडणी सुरु आहे अनेक उसतोड मजुर वाडीवस्तीवर कोप्या करुन रहात आहेत.वीज कनेक्शन कट झाल्याने त्यांच्या पिण्याच्या पाण्याची गैरसोय होत आहे. ज्यांचे उस तोड झाली आहे त्यांना नवीन फुटला होण्यासाठी तसेच ज्यांनी ज्वारी, हरभारा ,व जनावरांसाठी हिरवा चारा केला आहे त्यांना पाणी देणे गरजेचे असताना शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेण्याचे पाप शिंदे-फडणवीस सरकार करत आहे .उसबील आल्यानंतर शेतकऱ्यांकडून टप्पे पाडून वसुली करावी व तात्काळ वीज कनेक्शन पूर्ववत करावेत आशी मागणी केली आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष