By : Polticalface Team ,19-11-2022
गेल्या दोन दशकांपासून अहमदनगरच्या उड्डाणपुल्याच्या कामासाठी माजी खासदार दिवंगत दिलीप गांधी यांनी पाठपुरावा केला. मात्र, अहमदनगरच्या विकासाकामांमध्ये दिवंगत खासदार गांधी यांचे मोठे योगदान असून गांधींसह दिवंगत आमदार अनिल राठोड यांनी देखील अनेकदा आंदोलने, मोर्चा, प्रशासनाला निवेदने देऊन त्यांनी उड्डाणपुलाच्या कामासाठी पाठपुरावा केला. मात्र, आज त्यांच्या निधनानंतर शहराच्या राजकीय नेत्यांचा भाजपच्या नेत्यांना विसर पडलाय का? असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला होता.
विशेष म्हणजे या उद्घाटन कार्यक्रमाला भाजपसह राष्टवादीचे आमदार यांनीदेखील हजेरी लावली होती. कार्यक्रमामध्ये राज्याचे महसूल मंत्री आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे भाषण झाले. यावेळी भाषणात बोलताना विखे आणि गडकरी दिवंगत माजी आमदाराचे नाव घेण्यास विसरले. तसेच उड्डाणपुलाच्या खांबावर शिवचरित्र रेखाटण्यासाठी पुढाकार घेतला म्हणून खासदार सुजय विखे पाटील यांच्याबरोबर आमदार संग्राम जगताप यांचेही कौतुक झाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही आपापल्या त्यांचे कौतुक भाषणात केले. मात्र, कार्यक्रमाच्या अगदी शेवटी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिवंगत नेते अनिल राठोड यांच्या योगदानाचा उल्लेख केला.
अहमदनगरमधील शिवसेना कार्यकर्त्यांचा रोष नको म्हणून बाजू सावरण्याचा हा प्रयत्न होता, अशी चर्चा त्यानंतर सुरू झाली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भाषण संपून व्यासपीठ सोडत असताना पालकमंत्री विखे पाटील यांनी ऐनवेळी शिवसेनेचे दिवंगत उपनेते राठोड यांची आठवण काढून सावरासावर केल्याचं पाहायला मिळालं. पालकमंत्री विखे पाटील आणि खासदार विखे पाटील यांनी या कार्यक्रमातून एकप्रकारे शक्तीप्रदर्शन केले.
दरम्यान, उड्डाणपुलाच्या कामाचा श्रेयवाद हा सुरुवातीपासूनच रंगला आहे. खा. सुजय विखे पाटील यांनी या श्रेयवादात शिवसेना कार्यकर्त्यांचा रोष ओढवून घेतला होता. उद्घाटनापूर्वी उड्डाणपुलाची आमदार संग्राम जगताप यांच्याबरोबर पाहणी करताना शिवसेनेचे दिवंगत उपनेते अनिल राठोड यांचे नाव घ्यायचे ते विसरले होते. त्यावरून शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले होते. त्यानंतर नगरमधील नाराज शिवसैनिकांनी थेट उड्डाणपुलावर जाऊन श्रीफळ वाढवत उड्डाणपुलाचं अनौपचारिकरित्या उद्घाटन केले होते. त्यानंतर खासदार विखे पाटील यांनी कामाच्या व्यापात अनिल राठोड यांचे नाव घ्यायचे विसरून गेलो, अशी सारवासारव केली. त्यावेळी खासदार विखे पाटील यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली होती वाचक क्रमांक :
							प्रकाश म्हस्के 
							संपादक 							
 
  स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?
      
   
														  
  भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती  
  							  
  श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.
  							  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
      
   
														  
  भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.
  							  
  कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात. 
  							  
  कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न 
      
   
														  
  त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी 
  							  
  श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला  भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक
  							  
  दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई
      
   
														  
  निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.
  							  
  बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 
  							  
  लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना. 
      
   
														  
  पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे 
  							  
  पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट 
  							  
  दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.
      
   
														  
  लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
  							  
  दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई 
  							  
  श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
      
   
														  
  श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष