दिवंगत माजी आमदार अनिल राठोडांच्या नावाचा उल्लेख राहिला, पालकमंत्री विखेंनी केली दिलगिरी व्यक्त

By : Polticalface Team ,19-11-2022

दिवंगत माजी आमदार अनिल राठोडांच्या नावाचा उल्लेख राहिला, पालकमंत्री विखेंनी केली दिलगिरी व्यक्त अहमदनगर : दोन दशकांच्या प्रतिक्षेनंतर अखेर अहमदनगरचा उड्डाणपूल अखेर मोठ्या दिमाखात उभा राहिला आहे. आज या उड्डाणपूलाचं केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते डिजिटल पध्दतीनं झालं. या उद्घाटनाप्रसंगी संबोधित करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उड्डाणपूलासाठी पाठपुरावा करणाऱ्या सर्व राजकीय नेत्यांचं नाव घेऊन त्यांच मनभरुन कौतुक केल्याचं पाहायला मिळालं, मात्र, अहमदनगर शहराचे शिवसेनेचे माजी आमदार दिवंगत अनिल भैय्या राठोड यांचे नाव घेण्यास विसरल्याचं या कार्यक्रमात निदर्शनास आलं. शिवसैनिकांमध्ये नाराजी नको म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिवंगत माजी आमदार अनिल राठोड यांच्या नावाचा उल्लेख करत त्यांनी सारवासारव केली.

गेल्या दोन दशकांपासून अहमदनगरच्या उड्डाणपुल्याच्या कामासाठी माजी खासदार दिवंगत दिलीप गांधी यांनी पाठपुरावा केला. मात्र, अहमदनगरच्या विकासाकामांमध्ये दिवंगत खासदार गांधी यांचे मोठे योगदान असून गांधींसह दिवंगत आमदार अनिल राठोड यांनी देखील अनेकदा आंदोलने, मोर्चा, प्रशासनाला निवेदने देऊन त्यांनी उड्डाणपुलाच्या कामासाठी पाठपुरावा केला. मात्र, आज त्यांच्या निधनानंतर शहराच्या राजकीय नेत्यांचा भाजपच्या नेत्यांना विसर पडलाय का? असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला होता.

विशेष म्हणजे या उद्घाटन कार्यक्रमाला भाजपसह राष्टवादीचे आमदार यांनीदेखील हजेरी लावली होती. कार्यक्रमामध्ये राज्याचे महसूल मंत्री आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे भाषण झाले. यावेळी भाषणात बोलताना विखे आणि गडकरी दिवंगत माजी आमदाराचे नाव घेण्यास विसरले. तसेच उड्डाणपुलाच्या खांबावर शिवचरित्र रेखाटण्यासाठी पुढाकार घेतला म्हणून खासदार सुजय विखे पाटील यांच्याबरोबर आमदार संग्राम जगताप यांचेही कौतुक झाले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही आपापल्या त्यांचे कौतुक भाषणात केले. मात्र, कार्यक्रमाच्या अगदी शेवटी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिवंगत नेते अनिल राठोड यांच्या योगदानाचा उल्लेख केला.

अहमदनगरमधील शिवसेना कार्यकर्त्यांचा रोष नको म्हणून बाजू सावरण्याचा हा प्रयत्न होता, अशी चर्चा त्यानंतर सुरू झाली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भाषण संपून व्यासपीठ सोडत असताना पालकमंत्री विखे पाटील यांनी ऐनवेळी शिवसेनेचे दिवंगत उपनेते राठोड यांची आठवण काढून सावरासावर केल्याचं पाहायला मिळालं. पालकमंत्री विखे पाटील आणि खासदार विखे पाटील यांनी या कार्यक्रमातून एकप्रकारे शक्तीप्रदर्शन केले.

दरम्यान, उड्डाणपुलाच्या कामाचा श्रेयवाद हा सुरुवातीपासूनच रंगला आहे. खा. सुजय विखे पाटील यांनी या श्रेयवादात शिवसेना कार्यकर्त्यांचा रोष ओढवून घेतला होता. उद्घाटनापूर्वी उड्डाणपुलाची आमदार संग्राम जगताप यांच्याबरोबर पाहणी करताना शिवसेनेचे दिवंगत उपनेते अनिल राठोड यांचे नाव घ्यायचे ते विसरले होते. त्यावरून शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले होते. त्यानंतर नगरमधील नाराज शिवसैनिकांनी थेट उड्डाणपुलावर जाऊन श्रीफळ वाढवत उड्डाणपुलाचं अनौपचारिकरित्या उद्घाटन केले होते. त्यानंतर खासदार विखे पाटील यांनी कामाच्या व्यापात अनिल राठोड यांचे नाव घ्यायचे विसरून गेलो, अशी सारवासारव केली. त्यावेळी खासदार विखे पाटील यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली होती

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी