By : Polticalface Team ,20-11-2022
ट्विटमध्ये रोहित पवार म्हणाले की, आता डोक्यावरून पाणी चाललंय. त्यामुळं डोक्यात पाणी भरलेल्यांना महाराष्ट्राचं पाणी पाजण्याची वेळ आलीय. यावरुन भाजपवर निशाना साधलाय. भाजपच्या या वक्तव्यामुळं महाराष्ट्रासह देशभरातील वातावरण तापलेलं पाहायला मिळतय. विशेषतः राज्यातील लोकांची छत्रपती शिवाजी महाराजांवर नितांत श्रद्धा आहे.
भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केलंय. त्यांनी म्हटलंय की, छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पाच वेळा पत्रं लिहिली होती. त्रिवेदी म्हणाले की, त्या काळात अनेक लोक राजकीय संकटातून बाहेर पडण्यासाठी माफीनामा लिहीत असत. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून जोरदार निषेध केला जात आहे वाचक क्रमांक :