सत्ता पिसासू लोकांना खाली खेचा; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
By : Polticalface Team ,20-11-2022
मुंबई : प्रबोधनकार डॉट कॉम या संकेतस्थळाचा आज दादरमधील शिवाजी मंदिरात लोकापर्ण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे एकाच मंचावर आले होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी देशातील सद्य परिस्थितीवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
"स्वातंत्र्य अबाधीत ठेवण्यासाठी जे प्रयत्न करतील त्यांच्यासोबत आम्ही जायला तयार आहोत. केंद्राच्या गुलामीत राज्य नाही. राज्य आणि केंद्राला समान अधिकार आहेत. सगळं मलाच पाहिजे या हव्यासापोटी सत्ता काबीज केली जात आहे. राज्यघटना पायदळी तुडवून सत्ता पाहजे यांना पहिलं खाली खेचले पाहिजे. याबरोबरच सत्ता पिपासू लोकांना सत्तेतून खाली खेचा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, "सध्याची परिस्थिती पाहिली तरी आपल्या देशाची वाटचाल हुकुमशहाच्या दिशेने चालली आहे. इंग्रजांची निती होती तशी आज परिस्थिती निर्माण झाली आहे. जाती- धर्माच्या भिंती उभा करण्याचं काम सध्या सुरू आहे. वाटेल त्या मार्गाने सत्ता मिळवण्याचं काम सध्या सुरू आहे. त्यामुळे या सत्ताधाऱ्यांना खाली खेचलं पाहिजे. लोकशाही पायदळी तुडवून सत्ता मिळवणाऱ्यांना खाली खेचा."
"न्याय व्यवस्थेवर आता प्रश्न चिन्ह निर्माण केले जात आहेत. न्यायमुर्ती म्हणून सध्या जे बसले आहेत ते कसे आले आहेत? कायदा मंत्री ज्या प्रकारे बोलतात ते त्यांचं वैयक्तीक मत आहे का? ते स्पष्ट केलं पाहिजे. त्यांचा स्वभाव आहे की पिल्लू सोडायचं, ते मोठ झालं की मग पालकत्व स्वीकाराच, असा टोला यावेळी उद्धव ठाकरे यांनी लगावला
वाचक क्रमांक :