By : Polticalface Team ,23-11-2022
नाशिकहून त्र्यंबकेश्वरकडे जाताना अंजनेरी गावाजवळील एका अनाथ आश्रमांमधून धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या आधारतीर्थ आश्रमामध्ये एका लहान मुलाचा खून झाल्याचं समोर आलंय. या धक्कादायक घटनेनं परिसरात एकच खळबळ उडालीय. घटनेची माहिती समजताच समोर येताच याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली आहे.
आलोक विशाल शिंगारे असं या चिमुकल्याचं नाव आहे. तो आधारतीर्थ आश्रमात त्याच्या मोठ्या भावासोबत राहत होता. मंगळवारी सकाळच्या सुमारास आलोकचा मृतदेह आधारतीर्थच्या मागील बाजूस एका सफाई कर्मचाऱ्याला आढळला. यानंतर एकच खळबळ उडाली. दरम्यान दरम्यान पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर मृतदेह उत्तरीय तापसणीसाठी पाठविण्यात आला.
शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर आलोकचा गळा आवळून खून झाल्याचं प्राथमिकदृष्टया निष्पन्न झाल्याचं सहाय्यक पोलीस अधीक्षक माधुरी कांगणे यांनी सांगितलं. त्याचबरोबर सद्यस्थितीत त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात 302 प्रमाणं गुन्हा दाखल करण्यात आलाय. आश्रमातील मुलांची, पदाधिकारी, कर्मचारी वर्गाची चौकशी करण्यात येत आहे. त्यामुळं लवकरच या प्रकरणातील सत्य समोर येईल, असंही कांगणे यांनी सांगितलं वाचक क्रमांक :