By : Polticalface Team ,23-11-2022
मुख्यमंत्री शिंदे हे आज सपत्निक साईबाबा चरणी नतमस्तक झाले. यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील उपस्थित होते. त्यानंतर ते माध्यमांशी बोलताना म्हणाले, जत तालुक्यातील काही गावांना २०१२ मध्ये कर्नाटकमध्ये जाण्याचा ठराव केला होता. त्या काळी गावांमध्ये पाण्याची टंचाई होती. त्या ठिकाणी जल उपसासिंचन प्रकल्प सुरू करण्यात आले आहे. काही प्रकल्पांचे काम सुरू आहे. नवीन प्रकल्प केले जातील. जतमधील एकही गाव बाहेर जाणार नाही. वाचक क्रमांक :