By : Polticalface Team ,23-11-2022
या आंदोलनासंदर्भात बुलढाणा पोलिसांनी तुपकरांना नोटीस बजावली होती, परंतु अशा कितीही नोटीस आल्या तरी आता माघार घेणार नाही, जीव गेला तरी बेहत्तर पण शेतकऱ्यांचा हा लढा थांबणार नाही, असा निर्धार रविकांत तुपकर यांनी व्यक्त केला.
दरम्यान आता मुंबई मरीन ड्राईव्ह पोलिसांनी देखील तुपकरांना नोटीस पाठविली आहे.अरबी समुद्रात आजपर्यंत असे आंदोलन कोणीच केले नाही, या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. तसेच जलसमाधी घेणे हा गुन्हा ठरू शकतो त्यामुळे आपण हे आंदोलन करू नये असे या नोटीसमध्ये नमूद आहे.
बुलढाणा पोलिसांनंतर मुंबई पोलिसांनी देखील नोटीस दिली असून राज्यातल्या सर्व पोलीस स्टेशनची नोटीस आली तरी आता ही शेतकऱ्यांची फौज मागे हटणार नाही. पोलिसांनी अडवा अडवीचा प्रयत्न केल्यास रक्ताचे पाट वाहतील, असा आक्रमक आणि गंभीर इशारा रविकांत तुपकर यांनी दिला असून ही फौज आता वेगाने मुंबईकडे मार्गक्रमण करत आहे.
तुपकर यांच्या ताफ्याचे ठिकठिकाणी उत्साहाने स्वागत करत शेतकरी यात्रेत सहभागी होत आहेत. मुंबईतील अरबी समुद्रात जलसमाधी करण्यासाठी शेतकऱ्यांनी जाण्याची ही राज्यातील पहिलीच वेळ आहे शेतकऱ्यांच्या या फौजेमुळे प्रशासनात धडकी भरली असून मुंबई पोलिसांनी रविकांत पाठवून आंदोलन करण्याची विनंती केली आहे परंतु आता माघार नाही असा निर्धार करून पालवातील भाजी भाकर खाऊन शेतकऱ्यांची फौज मुंबईकडे आगे कूच करत आहे वाचक क्रमांक :