By : Polticalface Team ,23-11-2022
ते म्हणाले, माझ्यावर जेव्हा गुन्हा दाखल करण्यात येत होता तेव्हा मला पोलिसांची अस्वस्थता दिसून येत होती. पोलिस अधिकारीही काय करणार? पोलिस उभे राहिले तर कोणतंच सरकार काही करु शकत नाही, फार फार बदली करतील.
माझ्यावर तुम्ही गुन्हा दाखल करताना एक मिनिटाचा वेळ देखील घेतला नाही. त्या ठिकाणी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी चार दिवस घेतले. अनेक आंदोलने झाले त्यानंतर गुन्हा दाखल करून घेतल्याचं ते म्हणालेत.
जत हे त्यांचे नाही : जत हे त्यांचे नाहीच. मुंबई स्वातंत्र्य झाला तेव्हा सर्वात महाराष्ट्र हा आपल्याला मिळाला नव्हता. महाराष्ट्र सीमेवरील काही भाग हे महाराष्ट्राला मिळाले नाहीत. कर्नाटकच्या मुख्यमंत्री यांना आपल्या सरकारने उत्तर द्यायला हवे.
मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र : मागील प्रभाग रचनेच्या वेळी आजचे मुख्यमंत्री हे तेव्हाचे नगरविकास मंत्री होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्णपणे झाले होते. परंतु पुन्हा जर प्रभाग रचना होत असेल तर महाराष्ट्राचे 1500 कोटी पाण्यात गेले. ही प्रभाग रचना जर चुकीचे असेल तर तेव्हा या प्रभाग रचनेला मान्यता का दिली? तेव्हा तर कोणाचा दबावही नव्हता. इलेक्शन कमिशन सुद्धा पिंजऱ्यातला पोपट झालेला झाल्याचं ते म्हणाले आहेत.
दरम्यान, ठाण्यात चाललयं काय? तुम्ही एकाच घरातल्या तीन तीन जणांना मोक्का लावताय, मुंब्र्यामधला 354 चा प्रकार मी आयुष्यात विसरु शकत नसल्याचं त्यांनी म्हंटलयं. कोणाच्या दबावाखाली न राहता पोलिसांनी आता त्यांची ठाम भूमिका घेतली पाहिजे, असंही ते म्हंटलेत वाचक क्रमांक :