...तर पीक वीमा कंपन्यांची कार्यालयं ठिकाणावर ठेवणार नाही, रविकांत तुपकर यांचा इशारा

By : Polticalface Team ,26-11-2022

...तर पीक वीमा कंपन्यांची कार्यालयं ठिकाणावर ठेवणार नाही, रविकांत तुपकर यांचा इशारा बुलढाणा : पीक वीमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली तर याद राखा, तुमची कार्यालये ठिकाणावर ठेवणार नाही असा निर्वाणीचा इशारा स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे. रविकांत तुपकर म्हणाले, शेतकऱ्यांनी भरलेल्या प्रीमियम पेक्षाही कमी पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना कमी पैसे आले आहेत, त्या शेतकऱ्यांची जर कंपनीने तात्काळ 100 टक्के नुकसान भरपाईची रक्कम जमा केली नाही, तर एआयसी कंपनीचे बॉम्बे स्टॉक जागेवर ठेवणार नाही. तसेच बाकी कंपन्यांचेही कार्यालयात उध्वस्त करू, असा निर्वाणीचा कडक इशारा रविकांत तुपकरांनी दिला आहे. सरकारसोबत सकारामत्क चर्चा झाल्याने आंदोलन मागे घेतल्याचे तुपकर यांनी सांगितले. ते म्हणाले, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसेच इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथी गृहावर भेट झाली. यावेळी राज्य सरकारबरोबर सकारात्मक चर्चा झाली. तसेच जलसमाधी आंदोलनाच्या धसक्याने राज्याच्या कृषी विभागाच्या पायाखालची वाळू सरकरली आणि त्यांनी पीकविमा कंपन्यांना पीकविमा रक्कम जमा करण्याचे कडक आदेश दिले आहेत. त्यामुळे पीकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यास सुरवात केली, असंही त्यांनी सांगितलं. नुकसानीची आणि बाकी रकमेची आकडेवारी सांगताना तुपकर म्हणाले, राज्यात जवळपास 40 लाख हेक्टरवर नुकसान झालं आहे. दरम्यान स्थानिक नैसर्गिक आपत्तीचे 2 हजार 148 कोटी रुपयांचा पीकविमा मंजूर झाला आहे. त्यापैकी कंपन्यांनी 942 कोटी रुपये जमा केले आहेत व कंपन्यांकडे 1 हजार 205 कोटी रुपये बाकी आहे. तसेच पोस्ट हार्वेस्टिंग चा पीकविमा अजून बाकी आहे. परंतु काही ठिकाणी कंपन्यांनी शेतकऱ्यांची क्रूर थट्टा लावली आहे. काही कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात अत्यल्प पैसे जमा करून फसवणूक केली आहे. त्यात बुलढाणा जिल्ह्यातील एआयसी कंपनी शेतकऱ्यांची थट्टा करण्यात आघाडीवर आहे, अशी खंत देखील त्यांनी बोलून दाखवली. याअगोदरही तुपकर यांनी मागच्या वर्षी एआयसी कंपनीला दणका दिला होता, अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकविम्यासाठी तुपकरांनी एआयसी कंपनीचे बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज,मुंबई मधील 21 व्या मजल्यावरील कार्यालयाचा ताबा आम्ही घेतला होता व शेतकऱ्यांना पैसे मिळवून दिले होते
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी