ग्राम विकासाची चळवळ बळकट करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक लढवा,,,,, माजी आमदार नारायण आबा पाटील यांचे आवाहन
By : Polticalface Team ,30-11-2022
करमाळा प्रतिनिधी ग्रामविकासाची चळवळ बळकट करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूका लढवा, असे आवाहन आज माजी आमदार नारायण पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. करमाळा तालुक्यातील तीस ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर होऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून पाटील यांचेशी संवाद साधला असता पाटील गटाकडून सर्व गावात आमच्या विचारांचे कार्यकर्ते निवडणूक रिंगणात उतरत असल्याचे सांगण्यात आले.याबाबत अधिक स्पष्ट बोलताना त्यांनी सांगितले की स्थानिक पातळीवर कार्यकर्ते सक्रीय असून युवकांचा या निवडणूकीत मोठा सहभाग असल्याचे दिसून येत आहे. ग्रामविकास चळवळ बळकट करण्यासाठी अनूभव व उर्जा या दोन्ही गोष्टी एकत्रीतपणे आल्यास चांगले चित्र निर्माण होईल. गावपातळीवरही आता विकासाचा मुद्दा गडद होत असल्याने या निवडणूका आगामी मोठ्या निवडणूकांची दिशा ठरवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सध्या शिंदे -फडणवीस सरकारकडून पाठपुरावा करुन ग्रामविकासास पुरक कामांसाठी पुरक निधी मिळवण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. तसेच गायरान अतिक्रमण न हटवणे, वीजपुरवठा, दळणवळण व आरोग्य आदि विषयांबाबतही आपण महत्वाची भूमिका स्पष्ट करुन अनेक रखडलेल्या कामांची पुर्तता व्हावी म्हणुन आग्रही मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.तर मागील ग्रामपंचायत निवडणूक टप्प्यात माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालूक्यात दोनशेहून अधिक सदस्य निवडून आले होते. चालू ग्रामपंचायत निवडणूक टप्प्यात सुद्धा पाटील गटाचे सर्वाधिक उमेदवार सदस्य तसेघ जनतेतुन सरपंच या पदावर निवडून येतील असा ठाम विश्वास गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी व्यक्त केला.करमाळा तालूक्यात सध्या तीस ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची प्रक्रिया चालू असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. दिनांक 8 डिसेंबर रोजी अर्ज छानणी तसेच माघार घेण्याची अंतिम मुदत असल्याने त्यानंतर खरे राजकीय चित्र स्पष्ट होईल. सध्या तरी प्रत्येक राजकीय गटाकडून पॅनल पुर्ण करणे, आरक्षीत जागांवर उमेदवार उभे करणे, जनतेतून सरपंच पद असल्याने तगडा उमेदवार उभा करणे आदि बाबींवर भर दिला जात आहे.
वाचक क्रमांक :