ग्राम विकासाची चळवळ बळकट करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक लढवा,,,,, माजी आमदार नारायण आबा पाटील यांचे आवाहन

By : Polticalface Team ,30-11-2022

ग्राम विकासाची चळवळ बळकट करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक लढवा,,,,, माजी आमदार नारायण आबा पाटील यांचे आवाहन करमाळा प्रतिनिधी ग्रामविकासाची चळवळ बळकट करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूका लढवा, असे आवाहन आज माजी आमदार नारायण पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. करमाळा तालुक्यातील तीस ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर होऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून पाटील यांचेशी संवाद साधला असता पाटील गटाकडून सर्व गावात आमच्या विचारांचे कार्यकर्ते निवडणूक रिंगणात उतरत असल्याचे सांगण्यात आले.याबाबत अधिक स्पष्ट बोलताना त्यांनी सांगितले की स्थानिक पातळीवर कार्यकर्ते सक्रीय असून युवकांचा या निवडणूकीत मोठा सहभाग असल्याचे दिसून येत आहे. ग्रामविकास चळवळ बळकट करण्यासाठी अनूभव व उर्जा या दोन्ही गोष्टी एकत्रीतपणे आल्यास चांगले चित्र निर्माण होईल. गावपातळीवरही आता विकासाचा मुद्दा गडद होत असल्याने या निवडणूका आगामी मोठ्या निवडणूकांची दिशा ठरवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्या शिंदे -फडणवीस सरकारकडून पाठपुरावा करुन ग्रामविकासास पुरक कामांसाठी पुरक निधी मिळवण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. तसेच गायरान अतिक्रमण न हटवणे, वीजपुरवठा, दळणवळण व आरोग्य आदि विषयांबाबतही आपण महत्वाची भूमिका स्पष्ट करुन अनेक रखडलेल्या कामांची पुर्तता व्हावी म्हणुन आग्रही मागणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.तर मागील ग्रामपंचायत निवडणूक टप्प्यात माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तालूक्यात दोनशेहून अधिक सदस्य निवडून आले होते. चालू ग्रामपंचायत निवडणूक टप्प्यात सुद्धा पाटील गटाचे सर्वाधिक उमेदवार सदस्य तसेघ जनतेतुन सरपंच या पदावर निवडून येतील असा ठाम विश्वास गटाचे प्रवक्ते सूनील तळेकर यांनी व्यक्त केला.करमाळा तालूक्यात सध्या तीस ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची प्रक्रिया चालू असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. दिनांक 8 डिसेंबर रोजी अर्ज छानणी तसेच माघार घेण्याची अंतिम मुदत असल्याने त्यानंतर खरे राजकीय चित्र स्पष्ट होईल. सध्या तरी प्रत्येक राजकीय गटाकडून पॅनल पुर्ण करणे, आरक्षीत जागांवर उमेदवार उभे करणे, जनतेतून सरपंच पद असल्याने तगडा उमेदवार उभा करणे आदि बाबींवर भर दिला जात आहे.
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष