आरक्षण हा गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नसून हा प्रतिनिधीत्वाचा मामला आहे : वामन मेश्राम

By : Polticalface Team ,01-12-2022

आरक्षण हा गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नसून हा प्रतिनिधीत्वाचा मामला आहे : वामन मेश्राम करमाळा दि. 1 प्रतिनिधी बामसेफच्या 39 व्या व भारत मुक्ती मोर्चाच्या 12 व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या तयारी अंतर्गत तसेच 6 ऑक्टोबर 2022 रोजी नागपूर येथील आरएसएस हेडकॉटरवर भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. वामन मेश्राम साहेब यांनी काढलेल्या प्रोटेस्ट मोर्चाचे यशस्वी नेतृत्व केल्याबद्दल मा. वामनजी मेश्राम साहेब यांचा जाहीर सत्कार व त्या निमित्ताने करमाळा येथे आयोजित सोलापूर जिल्हास्तरीय जाहीर प्रबोधन संमेलनावेळी वामन मेश्राम आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलत होते.

या संमेलनापूर्वी आरपीआय चे प. महाराष्ट्र उपाध्यक्ष नागेश कांबळे यांनी महात्मा फुले यांच्या पुतळ्या जवळ मेश्राम यांचा भव्य सत्कार केल्या नंतर शहरातून भव्य रॅली काढण्यात आली ज्यामध्ये हजारों लोक सहभागी झाले होते. यावेळी बामसेफ आणि भारत मुक्ती मोर्चा यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राजेग्रुप रंभापुरा, बहुजन मुक्ती पार्टी,जमियत उलेमा ए हिंद, मुस्लिम सामाजिक व आर्थिक उन्नती अभियान, कुर्डुवाडीचे जाफर शेख आणि विविध समविचारी पक्ष, संघटनांनच्या वतीने मेश्राम यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

या संमेलनास उद्घाटक म्हणून आरपीआय-ए पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष नागेश कांबळे तर प्रमुख अतिथी म्हणून बामसेफचे राष्ट्रीय महासचिव डी. आर. ओहोळ आणि बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव ऍड. राहुल मखरे उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना मेश्राम म्हणाले की, गरिबी निर्मूलनासाठी सरकारने विविध योजना, बजेट, महामंडळ स्थापन करणे गरजेचे आहे. परंतु आरक्षण हे गरिबी निर्मूलनाचा मध्यम आहे असा गैरसमज पसरविला जात आहे. आरक्षण हे गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नसून ज्या समाजाचे पर्याप्त प्रतिनिधित्व शासन, प्रशासनात नाही त्यांना पर्याप्त प्रतिनिधित्व देण्यासाठी संविधानामध्ये तशी तरतूद करण्यात आली आहे. असे असे असताना सरकारने सवर्णांच्या गरिबी निर्मूलनाच्या नावाखाली इडब्लूएस आरक्षण मंजूर करून असंवैधानिकरित्या काम केले आहे. एकीकडे ओबीसीसाठी पन्नास टक्केची मर्यादा घालून बावन्न टक्के ओबीसींना सत्तावीस टक्के आरक्षण दिले आहे, आणि दुसरीकडे सवर्णांना त्यांच्या संख्येपेक्षा जास्त शासन प्रशासनात पर्याप्त प्रतिनिधित्व असून इडब्लूएसच्या माध्यमातून आणखी दहा टक्के जास्तीचे आरक्षण दिले आहे. हा ओबीसींवर होणारा अन्याय आहे.

असंवैधानिक इडब्लूएस आरक्षण त्वरित रद्द करावे अन्यथा त्या विरोधात आम्ही आंदोलन उभारू असा इशारा यावेळी मेश्राम यांनी दिला. यावेळी डी आर ओहोळ, ऍड राहुल मखरे, नागेश कांबळे, ऍड. तुकाराम राऊत, मौलाना मोहसीन शेख, गणेश करे पाटील, संजय चौधरी, बाळासाहेब पाटील, प्रा. डॉ. मनोजकुमार माने, विक्रमसिंह काटुळे, सुधाकर आवटे, ऍड. भास्कर पवार, भाऊसाहेब कांबळे, दिनेश माने आदी मान्यवरांनी विचार मांडले.

यावेळी प्रबोधन संमेलनासाठी प्रमुख अतिथी म्हणून करमाळा नगरपरिषदचे माजी नगराध्यक्ष शौकत नालबंद आणि दीपक ओहोळ यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे ता. अध्यक्ष हनुमंत मांढरे पाटील, जमियत उलेमा ए हिंदचे मौलाना मोहसीन शेख, संभाजी ब्रिगेड चे नितीन खटके, महिला विंगच्या राज्य प्रभारी उषा थोरात, बहूजन विकास संस्थेचे अध्यक्ष इसाक पठाण, संभाजी ब्रिगेडचे नितीन खटके, भाई राजू मगर, आनंद काशीद, भटके विमुक्त संघटनेचे सुखदेव चव्हाण, मातंग समाज संघटनेचे युवराज पवार, पारधी समाज संघटनेचे अनिल चव्हाण, जिल्हापरिषदचे अभियंता इंजि. सागर नागणे, सामजिक कार्यकर्ते किशोर थोरे, प्रशांत कांबळे, मल्लिनाथ बनसोडे, अजीज नदाफ, सुधाकर आवटे, डॉ. भारत पवार, बी.के. गायकवाड, कुमार लोंढे, शांतीलाल बागवाले आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी संमेलनाचे प्रास्तविक आर. आर. पाटील यांनी केले तर जनआंदोलन निर्माण निधीची घोषणा कय्युम शेख यांनी केली. सूत्रसंचालन कल्पेश कांबळे यांनी केले तर आभार सिद्धार्थ बोराडे यांनी मानले. सदर प्रबोधन संमेलन यशस्वी करण्यासाठी करमाळा व जिल्हा युनिटच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

स्थानिक राजकारणात वाढती घराणेशाही — सामान्य कार्यकर्त्यांचं काय?

भारतीय बौद्ध महासभा दौंड तालुका कार्यकारणी जाहीर. अध्यक्ष पदी दत्तात्रेय कोकाटे तर सरचिटणीस पदी दादासाहेब मोरे यांची नियुक्ती

श्रीगोंदा तालुका बुद्धिबळ संघटने कडून बुद्धिबळ स्पर्धा संपन्न.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

भांडगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभा सुरू असताना हृदयविकाराच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू.

कुरकुंभ एम आय डी सी येथील १ लाख ८० हजार किंमतीच्या चंदनाच्या झाडाची चोरी. पाच पैकी चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात.

कै.मुरलीधर (आण्णा) होनराव जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; श्रीगोंद्यात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने कारवाईची मागणी

श्रीगोंदा शहरातील एस मार्ट मॉलला भीषण आग आगीत कोट्यवधींचा माल जळून खाक

दौंड शहरातील अवैध गावठी हातभट्टी दारु विक्री व बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर दौंड पोलीसांची धडक कारवाई

निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या उपस्थितीत राहुलकुमार अवचट यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार प्रदान.

बोरीबेल येथील (डी.पी) विद्युत रोहित्रातील 80 किलो ताब्यांच्या तारा अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्या. दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

लिंबाच्या झाडाला घेतला गळफास, दौंड पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे गुणवरे वस्ती येथील धक्कादायक घटना.

पत्रकारांचे समाजभिमुख लिखाण ही काळाची गरज सचिव मेजर भीमराव ऊल्हारे

पेडगाव येथील बंधाऱ्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे सुरू प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष साहेब उघडा डोळे बघा नीट

दौंड तालुक्याचे नाव राज्याच्या पटलावरती नोंदवून प्रथम क्रमांक मिळवला. हरगुण सिंग नाहर. अजित पवार. हर्षवर्धन शितोळे पार्थ गांधले. सुखमिलन सिंग नाहर यांचे सर्वत्र होते कौतुक.

लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी

दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई

श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.

श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष