निवडणूका आल्या की शरद पवारांचे नाव घेतल्याशिवाय बातमी बनत नाही

By : Polticalface Team ,01-12-2022

निवडणूका आल्या की शरद पवारांचे नाव घेतल्याशिवाय बातमी बनत नाही मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर शाब्दिक टीका केली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी राज ठाकरेंवर शाब्दिक टीका केली आहे. राज ठाकरे यांना स्वतः चे ध्येयधोरण नसल्यामुळे त्यांच्या पक्षाला कुठल्याच निवडणुकीत यश मिळत नाही, त्या नैराश्यातून ते शरद पवारांवर बोलत असल्याची टीका महेश तपासे यांनी केली आहे.

पुढे बोलताना तपासे म्हणाले, निवडणूका आल्या की शरद पवार यांचे नाव घेतल्याशिवाय बातमी बनत नाही, हे समीकरण राज ठाकरे यांना कळाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे पवार नाव घेत नाही असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले आहे. ते त्यांचे वक्तव्य चुकीचे आहे, लोकांची दिशाभूल करणारे आहे. पवारांचे व्यक्तीमत्व काय आहे हे संबंध महाराष्ट्राला माहिती आहे, असे तपासे म्हणाले.

तसेच शिवरायांच्या अपमानावरून सध्या राज्यात वातावरण चांगलेच तापले आहे. यातच आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या एका वक्तव्याचा तपासे यांनी समाचार घेतला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, भाजप प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी, मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलाच. आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी देखील मुख्यमंत्र्यांनी केलेले बंड हे शिवरायांच्या गनिमी काव्यासारखे होते असे वादग्रस्त वक्तव्य केले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा आणि फितुरी यातील फरक आमदार संजय गायकवाड यांना कळतो का? असा संतप्त सवाल करत त्यांनी केलेल्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध तपासे यांनी केला आहे. तसेच शिवरायांचा अपमान करण्याची मालिका भाजपने व शिंदेसरकारने स्विकारली का अशी शंका आता जनतेच्या मनात येत आहे असेही महेश तपासे म्हणाले

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी