दौंड तालुक्यातील मौजे मिरवडी ग्रामपंचायतीचा विद्यार्थ्यांसाठी आगळा वेगळा उपक्रम,(मी कसा घडलो) विविध पदाधिकारी यांचा संवाद व मार्गदर्शन

By : Polticalface Team ,05-12-2022

दौंड तालुक्यातील मौजे मिरवडी ग्रामपंचायतीचा विद्यार्थ्यांसाठी आगळा वेगळा उपक्रम,(मी कसा घडलो) विविध पदाधिकारी यांचा संवाद व  मार्गदर्शन दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड, दौंड, ता,०५ डिसेंबर २०२२, दौंड तालुक्यातील मौजे मिरवडी ग्रामपंचायत विविध पुरस्कारांनी सन्मानीत आहे, आर आर आबा पाटील, स्मार्ट ग्राम पुरस्कार, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वाध्याग्राम पुरस्कार, आदर्श कृषीग्राम पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित असलेल्या ग्रामपंचायतीच्या वतीने आगळा वेगळा उपक्रम गावात सुरू करण्यात आला आहे, शनिवार दि,०३ डिसेंबर २०२२,रोजी मौजे मिरवडी ता दौंड जिल्हा पुणे, लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब बहुउद्देशीय सभागृहात, या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, गावातील प्राथमिक व उच्च शिक्षित इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी, विविध क्षेत्रातील नामवंत कर्तबगार, व्यक्तिमत्व प्राप्त असलेल्या व्यक्तींचे महत्वपूर्ण मार्गदर्शन व संवाद साधण्याचा उपक्रम दर शनिवारी राबविण्यास सुरुवात केली असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थीची संख्या वाढत चालली आहे.

युवा तरुण पिढीच्या हाती देशाचे भवितव्य अवलंबून असल्याचे भाकित ओळखुन सामाजिक उच्च शैक्षणिक उद्योजिक युवा तरुणांचे शैक्षणिक विद्यार्थ्यांचे प्रत्येक पाऊल प्रगतीकडे वाटचाल सुरू व्हावी, गावातील विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण अभ्यासक्रम घडवण्याच्या दृष्टीने, मी कसा घडलो हा उपक्रम राबविला जात आहे, खऱ्या अर्थाने विद्यार्थीना बाह्य जगाची ओळख निर्माण व्हावी, यासाठी विविध क्षेत्रातील उच्च शिक्षित पदाधिकारी नामवंत मान्यवरांन मार्फत मार्गदर्शक व संवाद घडवून आणला जात आहे, उच्च शिक्षित नामवंत पदाधिकारी मी कसा घडलो या संदर्भात दर शनिवारी विद्यार्थीना विशेष संवाद साधण्याची संधी ग्रामपंचायतीच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली असल्याने, शनिवार दि ०३ रोजी यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांचे विशेष संवाद साधण्याची विद्यार्थ्यांना संधी मिळाली होती, या प्रसंगी दीड ते दोन तास विद्यार्थ्यांनी अतिशय महत्वपूर्ण निडर संवाद साधण्याचा आनंद व्यक्त केला, या वेळी पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी आपल्या विद्यार्थी जीवनातील शैक्षणिक घडामोडी पासून ते पोलिस निरीक्षक अधिकारी पदा पर्यंत मोठ्या मेहनतीने पोचलो असल्याचे त्यांनी अनेक अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले.

या वेळी त्यांनी मुलांच्या विविध प्रश्नाचे अचूक उत्तरे देऊन मार्गदर्शन केले, तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक दृष्ट्या महत्वपूर्ण मार्गदर्शन करुन सर्वांना मी कसा घडलो या संदर्भात माहिती दिली, मौजे मिरवडी ग्रामपंचायत प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी विविध क्षेत्रातील उच्चशिक्षित कर्तबगार व नामवंत व्यक्तींमार्फत संवाद व मार्गदर्शन मिळण्या बाबत हा उपक्रम राबविण्यात आला होता, तसेच भविष्यात विद्यार्थी आपले ध्येय सफल साधण्यासाठी विविध क्षेत्रातील पदाधिकारी उद्योजक, खेळाडू, समाज सेवक, डॉक्टर, वकील, पोलीस निरीक्षक, एमपीसी, तहसीलदार, जिल्हाधिकारी, न्यायाधीश, असे अनेक उच्च दर्जाचे क्लास वन पदाधिकारी निर्माण व्हावेत, यासाठी विविध क्षेत्रातील नामवंत मार्गदर्शक प्रवक्ते यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संवाद घडवून आयुष्याला कलाटणी देण्याचा प्रयत्न केला जात आहे, या संदर्भात विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण होऊन कर्तबगार पदाधिकारी होण्याची भावना मनात निर्माण झाल्या शिवाय राहणार नाही, तसेच तालुकास्तरावर शैक्षणिक अभ्यासक्रमाला गती मिळुन विद्यार्थीना चांगले क्रमांक पटकावण्यात यश प्राप्ती होईल अशी अपेक्षा व्यक्त करुन, मौजे मिरवडी ग्रामपंचायत पदाधिकारी दूरदृष्टी ठेवून लक्षपूर्वक कार्य पार पाडत आहे, या वेळी यवत पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या हस्ते, नौशाद रजिस शेख, व अमर उमेश शेलार, यां विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला, या प्रसंगी सर्व विद्यार्थी ,शिक्षक ,ग्रामपंचायत आजी-माजी पदाधिकारी कर्मचारी कार्यकर्ते जेष्ठ नागरिक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी