जुळ्या मुलींशी लग्न करणाऱ्या तरुणाच्या अडचणीत वाढ, राज्य महिला आयोग आक्रमक

By : Polticalface Team ,05-12-2022

जुळ्या मुलींशी लग्न करणाऱ्या तरुणाच्या अडचणीत वाढ, राज्य महिला आयोग आक्रमक मुंबई : जुळ्या बहिणींसोबत लग्न करणं सोलापुरातील तरुणाला चांगलंच महागात पडलंय. या विवाहाची आता महिला आयोगानं दखल घेतली आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी आदेश दिलेत. त्यांनी याबाबतचे ट्विट देखील केले आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील महाळुंग येथील अतुल नावाच्या युवकानं शुक्रवारी कांदिवलीतील जुळ्या बहिणींसोबत विवाह केलाय. सोशल मीडियावर या विवाहाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याबाबत एकच चर्चा सुरू झालीय. त्यानंतर काल भारतीय दंड संहिता 1860 च्या 494 कलमानुसार अकलूज पोलीस ठाण्यात या विवाहाच्या विरोधात एनसीआर दाखल झालाय. याप्रकरणी माळेवाडी येथील राहुल फुले यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. त्यातच आता महिला आयोगानं कारवाईचे आदेश दिल्यानं संबंधित युवकाच्या अडचणींत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, सोलापूर येथील एका तरुणानं मुंबईतील जुळ्या बहिणींशी एकाच मांडवात लग्न केलंय. ह्या लग्नाची सोशल मीडियातून सर्वत्र चर्चा सुरु आहे. माध्यमातून ह्या लग्नाच्या बातम्या सुरु आहेत. भारतीय दंड संहितेच्या कलम 494 प्रमाणे हा गुन्हा आहे. तरी सोलापूर पोलीस अधीक्षक आपण उपरोक्त बाबत चौकशी करून त्वरीत कायदेशीर कारवाई करावी. तसेच केलेल्या कारवाई बाबतचा अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम 1993 चे कलम 12 (1) व 12 (2) अन्वये तात्काळ सादर करावा. त्यामुळं आता या नव्या नव्या नवरदेवाला या अनोख्या लग्नाचा काय फटका बसणार याकडं पाहावं लागणार आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी