By : Polticalface Team ,05-12-2022
सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील महाळुंग येथील अतुल नावाच्या युवकानं शुक्रवारी कांदिवलीतील जुळ्या बहिणींसोबत विवाह केलाय. सोशल मीडियावर या विवाहाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याबाबत एकच चर्चा सुरू झालीय. त्यानंतर काल भारतीय दंड संहिता 1860 च्या 494 कलमानुसार अकलूज पोलीस ठाण्यात या विवाहाच्या विरोधात एनसीआर दाखल झालाय. याप्रकरणी माळेवाडी येथील राहुल फुले यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. त्यातच आता महिला आयोगानं कारवाईचे आदेश दिल्यानं संबंधित युवकाच्या अडचणींत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय की, सोलापूर येथील एका तरुणानं मुंबईतील जुळ्या बहिणींशी एकाच मांडवात लग्न केलंय. ह्या लग्नाची सोशल मीडियातून सर्वत्र चर्चा सुरु आहे. माध्यमातून ह्या लग्नाच्या बातम्या सुरु आहेत. भारतीय दंड संहितेच्या कलम 494 प्रमाणे हा गुन्हा आहे. तरी सोलापूर पोलीस अधीक्षक आपण उपरोक्त बाबत चौकशी करून त्वरीत कायदेशीर कारवाई करावी. तसेच केलेल्या कारवाई बाबतचा अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम 1993 चे कलम 12 (1) व 12 (2) अन्वये तात्काळ सादर करावा. त्यामुळं आता या नव्या नव्या नवरदेवाला या अनोख्या लग्नाचा काय फटका बसणार याकडं पाहावं लागणार आहे. वाचक क्रमांक :