हिवाळी अधिवेशनावर २२ डिसेंबरला राज्यातील पोलीस पाटलांचा मोर्चा धडकणार, अनेक मागण्या प्रलंबित असल्यामुळे पाटिल संतत्प

By : Polticalface Team ,07-12-2022

हिवाळी अधिवेशनावर २२ डिसेंबरला राज्यातील पोलीस पाटलांचा मोर्चा धडकणार, अनेक मागण्या प्रलंबित असल्यामुळे पाटिल संतत्प प्रतिनिधी पुणे जिल्हा सह अनिल गायकवाड, राज्यातील पोलीस पाटीलांच्या विविध मागण्या गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. या मागण्यांसाठी अनेकदा निवेदन देण्यात आली मात्र सरकारने गंभीरतेने विचार केला नाही. दरम्यान महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील गाव कामगार संघ तसेच इतर संघटना आक्रमक झाल्या आहे. दिनांक 22 डिसेंबर रोजी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर राज्यातील हजारो पोलीस पाटील धडक देणार आहे. या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील आणि राज्यसचिव कमलाकर मांगले पाटील यांनी केले आहे. राज्यातील सर्व पोलीस पाटील यांच्या मागण्या मान्य करुन घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील गाव कामगार संघाचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील आणि राज्यसचिव कमलाकर मांगले पाटील परीश्रम घेत आहे. गेल्या अनेक वर्षापासून मागण्या प्रलंबित असल्यामुळे त्यांनी संपुर्ण राज्यभर दौरे करुन पोलीस पाटीलांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. आता मात्र संपुर्ण राज्यभरातील पोलीस पाटील एकवटले असून नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर धडक देणार आहे. पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ करून दरमहा किमान 18 हजार रुपये मिळावे, निवृत्तीचे वय साठ वर्षा वरून 65 वर्षांपर्यंत करण्यात यावे, निवृत्तीनंतर किमान पाच लाख रुपये ठोस रक्कम मिळावी, ग्राम पोलीस अधिनियम 1967 मध्ये दुरुस्ती करण्यास प्राधान्य देण्यात यावे, नूतनीकरण पहिल्या पाच वर्षानंतर कायमचे बंद करण्यात यावे, गृह व महसूल विभागातील पद भरती करताना पोलीस पाटलांना प्रत्येकी पाच टक्के आरक्षणाचा लाभ मिळावा, शासनातर्फे पोलीस पाटलांचा पाच लाख रुपयाचा विमा उतरण्यात यावा आणि त्यांचे हप्ते शासनातर्फे भरण्यात यावे, शासनाकडून पोलीस पाटलांना व त्यांच्या कुटुंबीयांना मेडिक्लेम मिळावा तसेच कार्यरत पोलीस पाटील मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना पोलीस पाटील म्हणून अनुकंपा तत्त्वावर घेण्यात यावे, प्रवास भत्ता व स्टेशनरी साहित्य खर्चासाठी दरमहा तीन हजार रुपये मानधनासोबतच मिळावेत, पोलीस स्टेशन व पोलीस चौकी असलेल्या व नव्याने शहरीकरण झालेल्या गावातील कार्यरत पोलीस पाटलांना त्यांच्या निवृत्ती काळापर्यंत कायम ठेवण्यात यावे, गडचिरोली सारख्या नक्षल प्रभावित जिल्ह्यामध्ये एखादा पोलीस पाटील मरण पावल्यास त्या पोलीस पाटलास कुटुंबीयांना नोकरी आणि वीस लाख रुपये शासनातर्फे देण्यात यावे अशा महत्वपूर्ण मागण्या घेऊन राज्यातील पोलीस पाटील अधिवेशनावर धडक देणार आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील गाव कामगार संघ राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील, महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील महासंघ राज्य अध्यक्ष मोहनराव शिंगटे अण्णा, महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील फाउंडेशन राज्य अध्यक्ष राजकुमार यादव पाटील, महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील अमरावती अध्यक्ष प्रफुल गुल्हाने पाटील., निरंजन गायकवाड पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी कार्यकारी अध्यक्ष श्रीकृष्ण साळुंखे पाटील, कार्यकारी अध्यक्ष भृंगराज परशुरामकर पाटील, राज्य उपाध्यक्ष ज्ञानेश्वर राव महाजन पाटील, राज्य संघटक बळवंत काळे पाटील, राज्य संघटक नवनाथ धुमाळ पाटील, राज्य सहसचिव गोरखनाथ टेमकर पाटील, खानदेश विभाग प्रमुख दादासाहेब कारभोर पाटील, कोकण विभाग अध्यक्ष साईनाथ पाटील, महिला आघाडी महाराष्ट्र राज्य प्रमुख, नागपूर विभाग अध्यक्ष विजय घाडगे पाटील, नागपूर जिल्हा अध्यक्ष रितेश दुरूगकर पाटील, बुलढाणा जिल्हाध्यक्ष राजेंद्र भामद्रे पाटील, भंडारा जिल्हाध्यक्ष सुधाकरराव साठवणे पाटील, यवतमाळ जिल्हाध्यक्ष रविशंकर ढोले पाटील, वाशिम जिल्हा अध्यक्ष राठोड पाटील, वर्धा जिल्हा अध्यक्ष ढोकणे पाटील, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विश्वनाथ पाटील, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अजित खोत पाटील, कोकण विभागीय कार्याध्यक्ष डी एस कांबळे पाटील, जळगाव जिल्हाध्यक्ष नरेंद्र शिंदे पाटील, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष हनुमंत देवकते पाटील, मराठवाडा विभागीय सचिव महादेव भालेराव पाटील, मराठवाडा विभाग अध्यक्ष जब्बार पठाण, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष योगेश मते पाटील, अमरावती विभागीय अध्यक्ष रामकृष्ण तायडे पाटील, निरंजन गायकवाड पाटील तसेच सर्व महिला आघाडी जिल्हाध्यक्ष हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहे. पोलीस पाटील पद हे गावातील महसूल आणि गृह विभागाचा महत्त्वाचा कणा मानला जातो. राज्यातील सर्व पोलीस पाटील गेल्या अनेक वर्षापासून गावातील सर्व माहिती शासनाला पुरवणारा एक दुवा म्हणून काम करत आहे. असे असतांना त्यांच्या प्रलंबीत मागण्यांकडे सरकार गंभीरतेने बघायला तयार नाही. त्यामुळे आम्हाला मागण्या मंजुर करुन घेण्यासाठी हिवाळी अधिवेशनावर धडक देण्याशिवाय पर्याय राहीलेला नाही अशी प्रतिक्रिया. निरंजन गायकवाड पोलीस पाटील, यवतमाळ यांनी व्यक्त केले आहे,
वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी