By : Polticalface Team ,07-12-2022
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यालयाचे प्रा ज्ञानदेव धायगुडे यावेळी म्हणाले की, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या उज्वल भविष्यासाठी तरुणांना शिकवण देत शिका, संघटित व्हा, आणि संघर्ष करा या विषयी मार्गदर्शन करत डॉ आंबेडकर यांच्या कार्याविषयी उजाळा दिला.
याप्रसंगी अध्यक्षपदावरून मार्गदर्शन करताना प्राचार्य दत्तात्रय सस्ते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञान पीपासू होते. परदेशात जाऊन शिक्षण घेऊन देशाची राज्यघटना तयार करणे म्हणजे सोपे काम नव्हते. ते काम डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या बुद्धी कौशल्यावर केले. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत प्रतिकूल व बिकट असताना रात्रंदिवस अभ्यास करून ज्ञान संपादन करत देशाची राज्यघटना तयार केली. त्याकाळी देशाला डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपाने महान हिरा मिळाला. म्हणूनच त्यांना राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून संबोधले जाते. विद्यार्थ्यांनी देखील सतत अभ्यासातून ज्ञान संपादन करत, डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे अनुकरण करण्याची आवश्यकता असून, तरुण पिढीने देखील भविष्यात कुटुंबाच्या व देशाच्या विकासात हातभार लावण्यासाठी भरपूर ज्ञान संपादन करण्याची आवश्यकता असल्याचे प्राचार्य सस्ते यांनी यावेळी सांगितले.
यावेळी विद्यालयाची विद्यार्थिनी धनश्री बोरुडे या विद्यार्थिनीने महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याविषयी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रास्ताविक विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक शिवाजी इथापे यांनी केले. आभार उपशिक्षक संजय दळवी यांनी मानले. वाचक क्रमांक :