शेतकऱ्यांसह नहाटा यांचे श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषण.
By : Polticalface Team ,09-12-2022
श्रीगोंदा :
दोन दिवसात वीज पुरवठा पूर्ववत करा अन्यथा आंदोलन ’ श्रीगोंदा तालुक्यात पाच महिने सातत्याने पाऊस पडत असल्याने पाच महिने रोहित्र बंद राहिले . तरी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मागील पाच महिन्यांतील वीज बिलासाठी शेतकऱ्यांची अडवणूक करत आहेत . शेतकरी अडचणीत असल्याने त्यांचे कडून वीजबीलपोटी एक हजार रुपये प्रति शेतकरी या प्रमाणे वीज बिल वसूल करावे . या मागणीसाठी राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहटा यांनी शेतकऱ्यांसह श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषण सुरू केले होते . येत्या दोन दिवसात शेतकऱ्यांची वीज पूर्ववत करावी अन्यथा ११ तारखेला वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात मोठे आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा यावेळी दिला असून , गेली पाच महिने सातत्याने पाऊस पडत होता पाच महिने रोहित्र बंद होते . अश्या वेळी शेतकऱ्यांकडून वीज बील आकारणी करणे चुकीचे असल्याचे सांगत वीजबील एक हजार रुपये प्रति शेतकरी या प्रमाणे वीज बिल वसूल करावे . तसेच येत्या दोन दिवसात शेतकऱ्यांची वीज पूर्ववत करावी , अन्यथा ११ तारखेला वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात मोठे आंदोलन उभारण्यात येईल , असा इशारा यावेळी राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहटा यांनी दिला . यावेळी प्रांताधिकारी सुधाकर भोसले , तहसीलदार मिलिंद कुलथे , पुरुषोत्तम लगड , जयराज लगड , किरण जगताप यांच्या सह वीज वितरण कंपनीचे अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते . अधिकाऱ्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी आणि सिंगल फेज लाईट न सोडण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण सोडण्यात आले . तालुक्यातील शेतकरी हे अतिशय संयमी असून त्यांच्या संयमाचा वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी अंत पाहू नये , असे सांगत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी पाठ फिरविली असून , लोकप्रतिनिधींना भविष्यात याची किंमत मोजावी लागणार असल्याचे या वेळी बोलताना नाहटा यांनी सांगत . मढेवडगाव येथील वीज उपकेंद्रामध्ये वीज बिल भरण्यासाठी शेतकरी गेले असता येथील अधिकारी हे शेतकऱ्यांशी उद्धटपणाने वागत त्यांना अपमानास्पद वागणूक देत आहेत. या पद्धतीने वागणे बंद करावे हे या वेळी बोलताना सांगीतले.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी