सनदी अधिकाऱ्याच्या व ग्रामपंचायतीच्या संगनमताने २ गुंठे क्षेत्रावर अतिक्रमण करून केला वहीवाटीचा रस्ता बंद राजाळे.(ता.फलटण).
By : Polticalface Team ,12-12-2022
दिनांक ९/१२/२०२२ राजाळे गावातील शंभूसेना जिल्हाध्यक्ष निखिल निंबाळकर यांनी ९/०६/२०२२ रोजी मा. जिल्हाधिकारी व जिल्हा भूमि अभिलेख कार्यालय सातारा यांना ग्रामस्थांच्या सह्या घेऊन निवेदन देऊन राजाळे गावातील गट.नं.६२६ ,६२७ मधून जाणारा जानाई मंदिर ते सरडे रोड हा जुना रस्ता पुण्यातील संतोष पांडुरंग मेंगे यांनी महाराष्ट्र शासन मुळ भोगवटादार बाळकृष्ण बनकर यांच्या कडून १४० चौ.मी क्षेत्र विकसन करार करून घेतले होते.त्या जागेवर अतिक्रमण करून रस्ता बंद केला आहे. तो काढून मिळावा म्हणून अर्ज व निवेदन मुळ कागदपत्रासह दिले होते त्याची दखल घेऊन तहसिलदार फलटण यांना योग्य कारवाई करण्याचे जिल्हाधिकारी यांनी कळविले होते त्यानुसार भूमि अभिलेख फलटण कार्यालयात ६२६ व ६२७ मोजनीचे पैसे निखिल निंबाळकर यांनी भरून दिनांक १९/१०/२०२२ रोजी भूमि अभिलेख कार्यालय फलटण येथील कर्मचारी शेलार साहेब यांनी लगतदार पंच ग्रामसेवक यांच्या समक्ष शासकीय मोजनी केली असता. मोजणीच्या नकाशावरून असे निदर्शनास आले आहे की पुण्यातील मेंगे यांनी राजाळे गावातील माजी सनदी अधिकारी याच्या मार्फत ती जागा घेऊन २००८ २००९ मध्ये त्या जागेवर २ गुंठे पेक्षा जास्त क्षेत्रावर अतिक्रमण करून इमारत बांधकाम केले आहे. आणि इमारतीतील गाळे दुकाने गावातील लोकांना बेकायदेशीर दस्त करून ग्रामपंचायतीच्या संगनमताने भाडे करार करून नोंदी केल्या आहेत. तरी तहसिलदार फलटण यांना भूमिअभिलेख कार्यालायाने अहवाल पाठवला असून त्यावर काय कारवाई केली जाणार याची संपूर्ण गावातील ग्रामस्थ वाट पाहत आहेत. माजी सनदी अधिकारी याच्या दबावामुळे शासकीय कारवाई करू नये या साठी दबाब असल्याची चर्चा आहे. तरी या प्रकरणावर जिल्हाधिकारी कार्यालयाने योग्य कारवाई केली नाही तर ग्रामस्थ उपोषण व जनहित याचिका दाखल करून न्याय मिळविण्याच्या तयारीत आहेत.
वाचक क्रमांक :