महात्मा गांधी जुन्या तर नरेंद्र मोदी नव्या भारताचे राष्ट्रपिता, अमृता फडणवीसांचं वादग्रस्त विधान...
By : Polticalface Team ,21-12-2022
नागपूर : गेल्या काही दिवसांपासून राज्यात भाजपच्या नेत्यांकडून अनेकदा महापुरुषांबद्दल वादग्रस्त विधाने करण्यात आली. त्यावरुन राज्यभरात विरोधकांकडून अनेक आंदोलने, मोर्चे, प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन असे अनेक मोर्चे निघाले. नुकताच महाविकास आघाडी सरकारकडून सत्ताधारी सरकारविरोधात विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचा अजेंडाच महापुरुषांबद्दल भाजपच्या नेत्यांकडून होत असलेली अवहेलना, अवमानकारक वक्तव्ये त्याचबरोबर एकमेकांशी तुलना भाजपच्या काही नेत्यांकडून करण्यात आली.
यामध्ये विशेषत: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, आमदार प्रसाद लाड, सुधांशू त्रिवेदी यांच्यासह इतर नेत्यांकडून महापुरुषांबद्दल अवमानजनक वक्तव्ये केल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारडून करण्यात आला. या विरोधात विविध संघटनांसह सर्व विरोधी पक्षांनी आवाज उठवून वादग्रस्ते वक्तव्ये करणाऱ्या नेत्यांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
या प्रकरणावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये खडाजंगी सुरु असतानाच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी एक वादग्रस्त विधान केलंय. त्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केलीय.
फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांनी राष्ट्रपिता मुद्यावरून केलेल्या विधानावरून आता नवा वाद रंगण्याची चिन्हे आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यानंतर आता अमृता फडणवीस यांनी महात्मा गांधी यांच्या राष्ट्रपिता या मुद्यावरून केलेल्या व्यक्तव्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अमृता फडणवीस यांनी एका कार्यक्रमात हे विधान केलंय. नागपूरमध्ये अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्थेतर्फे अभिरुप न्यायालय आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी फडणवीस यांना प्रमुख पाहुण्या म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. या न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून अॅड. कुमकुम सिरपूरकर यांनी तर वकील म्हणून अजेय गंपावार आणि लिपिक म्हणून रश्मी पदवाड-मदनकर यांनी काम पहिले. या संस्थेच्या पहिल्या अध्यक्षा ताराबाई शास्त्रींच्या स्मृतिनिमित्त कार्यक्रम आयोजिला होता.
कार्यक्रमात अमृता फडणवीस यांचं भाषण झालं. यावेळी त्या म्हणाल्या, आपल्या देशाचे दोन राष्ट्रपिता आहेत. महात्मा गांधी हे जुन्या भारताचे तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत. मी स्वत:हून कधीही राजकीय वक्तव्य करत नाही. मला त्यात रसही नाही. माझ्या वक्तव्यावर सामान्य लोक मला ट्रोल करीत नाहीत. राष्ट्रवादी किंवा शिवसेनेचे ते कल्पक असतात. त्यांना मी फारसे महत्त्व देत नाही आणि घाबरतही नाही.
मी फक्त माझ्या आई व सासूबाईंना घाबरते. मी जास्त बोलले तर माझे आणि देवेंद्र आम्हां दोघांचेही नुकसान होते, ही बाब मला आता कळून चुकली आहे. याचा फायदा अनेकांनी दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून घेतला आहे. मी खूप बोलते, अशी तक्रार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे करण्यात आली होती हे खरे आहे. पण मी आहे तशी आहे. प्रतिमा तयार करण्यासाठी मी काहीही बदल केले नसल्याचं अमृता फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.
दरम्यान, आधीच वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असलेले भाजपचे नेते आणि त्यात आता देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी केलेल्या विधानामुळे त्या वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी