आम्हाला कुणी पोरगी देत नाही! सरकारनेच हस्तक्षेप करावा, मुंडवळ्या बांधून, घोडीवर बसून भावी नवरदेव जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले
By : Polticalface Team ,22-12-2022
करमाळा प्रतिनिधी सरकारी नोकरदार असलेल्या मुलांना कुणीपण मुली कोणीही देत आहे, परंतु सर्वसामान्य, शेतमजूर, शेतकरी कुटुंबातील मुलांना आज मुली मिळणे कठीण झाले आहे, अशा परिस्थितीमध्ये सरकारने यावर उपाययोजना करून, या प्रश्नात हस्तक्षेप करावा व हा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी करत मोहोळ तालुक्याचे माजी नगराध्यक्ष रमेश बारस्कर यांच्या नेतृत्वात भावी नवरदेवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. आम्ही शेतकरी, शेतमजूर असल्याने आम्हाला कुणी मुलगी देत नाही, सरकारनेच यात हस्तक्षेप करून आम्हाला वधू प्राप्ती करून द्यावी, अशी मागणी या भावी नवरदेवांनी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकडे केली आहे. मुंडवळ्या बांधून व घोडीवर बसून हे भावी नवरदेव जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले
सध्या मुलाचे वय होऊनदेखील मुली मिळणे कठीण झाले आहे. याबरोबरच मुलीच्या आई-वडिलांचे अपेक्षा दिवसेंदिवस वाढत चालली आहे. चांगले शिक्षण, नोकरी, शेती असावी अशी अपेक्षा असते. तर दुसरीकडे अनेक जणांकडे शेती, चांगली परिस्थिती असूनदेखील मुलगी मिळत नाही. त्यामुळे कुटुंबातील आई-वडील मुलगा हे डिप्रेशनमध्ये जात आहेत. सध्या देशात १ हजार मुलांमागे ८५० मुली आहेत. त्यामुळे गर्भलिंग निदान कायदा करूनदेखील त्याची अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे अनेक मुलांना मुलगी मिळत नाही. अनेक युवक लग्नासाठीची वयोमर्यादा ओलांडून गेली तरी त्यांची लग्ने होत नाहीत. त्यामुळे शासनाने याची दखल घ्यावी, अशी मागणी माजी नगराध्यक्ष बारसकर यांच्या नेतृत्वातील मोर्चेकरी भावी नवरदेवांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या वेळी सोलापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत नवोदित वरांची वाजत गाजत वरात काढण्यात आली. यावेळी मुंडवळ्या बांधून व घोडीवर बसून भावी नवरदेव या आंदोलनात सहभागी झाले होते.
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
लोकसहभागातून संत सेना महाराज यांचे मंदिर उभारणी
दौंड शहरातील बेकायदा बिगर परवाना गावठी हातभट्टी दारू विक्री व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी केली कारवाई
श्रीगोंद्यात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत २९ तारखेला भव्य शेतकरी मेळावा.
श्रीगोंदा तालुक्यात खुलेआम अवैद्य गुटखा विक्री प्रशासनाचे दुर्लक्ष
गोपाळवाडी गावच्या विकासासाठी प्रयत्न करणार- नवनिर्वाचित सरपंच स्वातीताई पवार
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
अनैतीक संबंधाचे कारणा वरून प्रविण पवार यास कोयत्याने डोक्यात वार करून जीवे ठार मारलेले दौंड शहरातील धक्कादायक घटना
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत दुधनी जि प शाळेच्या अंजली गुंजोटे प्रथम
१५ ऑगस्ट ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त व श्रीकृष्ण जन्माष्टमी या दुग्ध शर्करा योगाचे औचित्य साधून (लडकतवाडीत ५०० पेरु फळ वृक्षरोपण) एक झाड एक जीवन अभियान.
अनाथ सेवक सामाजिक कल्याण संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने. काशिनाथ चौगुले यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार.
‘युनिटी ऑफ मूलनिवासी‘ चे दुसरे राज्य अधिवेशन अ. नगरमध्ये
"शेतकऱ्यांनो, जागे व्हा! आता रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळणार नाही" आमदार बच्चु कडूं
मौजे वरवंड गावचे हद्दीत एका युवकाच्या डोळ्यात विटेचा ठोकळा डोक्यात घालुन केला होता खुन. यवत पोलीसांनी २ दिवसात गुन्हेगारांचा लावला छडा. दोन आरोपी जेरबंद.
यवत गाव दोन दिवस शिथिल नंतर गुरुवार पासून जमावबंदीचा आदेश संपुष्टात यवत बाजार पेठ झाली सुरू. हिंदू मुस्लिम सर्वधर्मीय शांतता बैठक संपन्न
यवत गावात जमावबंदी लागू तीन दिवसा पासून गाव बंद ठिक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
वाढदिवसाला केक नको, पृथ्वी हवी! संविधान दीपक म्हस्के याचा अनुकरणीय उपक्रम
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष पद्दी डॉ अमोल झेंडे व सचिव पद्दी अनिल तुपे यांची बिनविरोध निवड
चौफुला आंबिका कला केंद्रात संगीत बारी सुरू असताना हवेत झाला गोळीबार चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल.