कोळेगाव धरणप्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नी हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रालयात बैठक लावणार - मंत्री शंभुराज देसाई

By : Polticalface Team ,23-12-2022

कोळेगाव धरणप्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नी हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रालयात बैठक लावणार - मंत्री शंभुराज देसाई
करमाळा प्रतिनिधी; आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी करमाळा तालुक्यातील कोळगाव धरण प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबतच्या विधानपरिषदेत लक्षवेधी उपस्थित केली असता सरकारच्या वतीने मंत्री शंभुराज देसाई यांनी पुनर्वसितांना पर्यायी जमिनी देण्यासंदर्भात पुनर्वसन कायद्यातील तरतुदी नुसार विहीत ६५% रक्कम कशा व कोणत्या पद्धतीने भरून घ्यायच्या यांच्यासाठी सर्वंकष धोरण ठरवावे लागेल व कोळगाव सारखे अजून कीती प्रकल्पग्रस्त लोकांनी पुनर्वसनाची मागणी केलेली आहे व ज्या त्या प्रकल्पांच्या लाभक्षेत्रात पुनर्वसनासाठी जमिनी उपलब्ध आहेत का यासाठी अधिवेशन संपल्यानंतर विस्तृत बैठक घेण्याचे व या बाबतीत धोरण ठरवण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या सोबत चर्चा करून योग्य तो निर्णय घेऊ म्हणून आश्वस्त केले.

त्याच प्रमाणे सिना कोळगाव प्रकल्पाच्या लाभक्षेत्रामध्ये जमिनींचे संपादन न केल्यास लाभक्षेत्रातील प्रस्तावित शेतकर्यांच्या जमीनीवरील शेरे पुर्णपणे उठवण्याबाबत सरकारने धोरण ठरण्याची मागणी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केली त्यावेळी मंत्री शंभुराज देसाई यांनी पुनर्वसितांसंबधी सर्वकष धोरण ठरवुन त्यांच्या समस्यावर मार्ग काढनार असल्याचे सांगितले.

चर्चेवेळेस पंढरपूर तालुक्यातील उजनी प्रकल्पगस्त काही गावे पंढरपूर नगरपरिषदेच्या हद्दीत गेलेली आहेत त्यांना पुनर्वसन अंतर्गत मिळाल्या जाणार्‍या नागरी सुविधा अजून मिळालेल्या नाहीत तर मंगळवेढा तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांना जमिनींचे वाटप झालेले आहे पंरतु त्यांना गावठाण अद्याप ही मिळाले नसल्याचा मुद्दा आ.मोहिते-पाटील यानी सभागृहात उपस्थित केला यावर मंत्री देसाई यांनी संबंधित प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन आराखड्यात त्यांचे पुनर्वसन करण्याचे निश्चित आहे गावठाण देण्याचे निश्चित आहे संबंधित प्रकल्प पुनर्वसनाच्या आरखड्यात ज्या तरतुदी केलेल्या आहेत त्या तरतुदीची लवकरात लवकर कार्यवाही केली जाईल असे सांगितले.

करमाळा तालुका आणि परांडा तालुका लाभक्षेत्र असलेल्या सिना कोळेगाव प्रकल्पास १९९२ साली प्रसासकीय मान्यता देण्यात येऊन १९९४ साली या प्रकल्पाचे प्रत्यक्षात काम सुरु झाले.२००७ साली या धरणाचे काम पुर्ण होऊन पाणी साठवण्यास सुरवात झाली.सिना कोळगाव प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ५.३१५ TMC इतकी असुन यामुळे करमाळा आणि परांडा तालुक्यातील १३४३५ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येनार आहे.यात करमाळा तालुक्याच्या पुर्व भागातील सुमारे ४००० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणारआहे.

यासाठी करमाळा तालुक्यातील शेकडो शेतकर्यांनी आपल्या जमीनींचा प्रकल्पासाठी त्याग केला आहे. सिना कोळगाव प्रकल्पासाठीच्या एकुन ३१८१ हेक्टर बुडीत क्षेत्रापैकी करमाळा तालुक्यातील सुमारे १५०० हेक्टर एवढे क्षेत्र बुडीत झाले आहे.

सिंचनाच्या दृष्टीने काढण्यात आलेल्या कालव्यांची करमाळा तालुक्यातील एकुण लांबी २५.५० किमी एवढी असुन त्यासाठी करमाळा तालुक्याच्या पुर्व भागातील शेतकर्यांच्या जमिनी संपादित करण्यात आलेल्या आहेत. यासंदर्भात २०१२ साली विजयसिंह मोहिते पाटील साहेब यांनी तत्कालीन पुनर्वसन मंत्री मा.पतंगराव कदम यांचे दालनात मिटींग लावली होती.त्यामध्ये सिना कोळगाव प्रकल्पग्रस्तांना खास बाब म्हणुन पर्यायी जमिनी देण्याच्या दृष्टीने दोन महिन्याच्या आत प्रस्ताव दाखल करुन कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते परंतु करमाळा तालुक्यातील कोळगाव,आवाटी निमगाव (ह), हिवरे,भालेवाडी मिरगव्हाण,गौंडरे या गावातील प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमीनी अजुनही मिळाल्या नाहीत आणि मोबदला ही देण्यात आलेला नाही.अगोदर पुनर्वसन नंतर धरण हे सरकारचे धोरण असताना गेली २७ वर्षापासुन कोळगाव प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न प्रलंबित आहे लक्षवेधीच्या चर्चेवेळेस आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सविस्तर प्रश्न उपस्थित केले.
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी सिना कोळगाव धरणग्रस्तांसंबधी तत्कालीन पुनर्वसन मंत्री कै पतंगराव कदम यांच्या दालनात बैठक लावून दोन महिन्यात पुनर्वसितांना पर्यायी जमिनी देण्यासंदर्भात पुनवर्सन कायद्यानुसार विहीत ६५% रक्कम भरण्यास मुदतवाढ देण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेले होते तरी अजूनही अमंलबजावणी का झाली नाही याचीही चौकशी करणार असल्याची माहिती मंत्री शंभुराज देसाई यांनी विधानपरिषदेत दिली.


वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी