पुन्हा लोकडाऊन नको - अनिल घनवट

By : Polticalface Team ,25-12-2022

पुन्हा लोकडाऊन नको - अनिल घनवट लिंपणगाव (प्रतिनिधी) - चीन सहित इतर काही देशांमध्ये कोविडच्या वाढत्या प्रदूर्भावाचा धसका घेत भारतात पुन्हा लोकडाऊन करण्याचे नियोजन सुरू असल्याचे दिसते. लोकडाऊनमुळे आरोग्याला व अर्थव्यवस्थेला फायदा होण्या ऐवजी नुकसानच जास्त होत असल्यामुळे सरकारने पुन्हा लॉक डाऊन घोषित करू नये. तसे केल्यास स्वतंत्र भारत पार्टी, लोकडाऊन न पाळण्याचे आंदोलन जाहीर करेल असा इशारा स्वतंत्र भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

कोरोना व्हायरसचा नवीन व्हरीयनंट जगभर झपाट्याने पसरतो आहे व मोठ्या संख्येने लोक मृत्युमुखी पडत आहेत असा खोटा प्रचार प्रसार माध्यमात जोर धरत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पुन्हा मास्क वापरण्याची सक्ती आणि लोकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

इंडियन मेडिकल असोसीएशन ने सावधानतेचा उपाय म्हणून, सार्वजनिक जागेत मास्क वापरण्याची सक्ती, सोशल डिस्टन्सिंग, सर्व प्रकारचे सार्वजनिक, राजकीय कार्यक्रम, लग्न, सार्वजनिक मेळावे घेण्याचे टाळावे आशा मारदर्शक सूचना राज्यांना दिला आहेत. अंतर राष्ट्रीय प्रवास टाळण्याचे व सर्व विमान प्रवाशांना लसीकरण सक्तीचे केले आहे. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची कोविड चाचणी व लक्षणे आढळल्यास विलगिकरणात ठेवण्याच्या सुचना, दि. २२ डिसेंम्बर रोजी दिल्या आहेत.

याची पुढील पातळी म्हणजे लोकडाऊन. मागील लोकडाऊन मध्ये देशाचे मोठे नुकसान झाले आहे. जनतेला मोठा त्रास सहन करावा लागला, कामगारांना हजारो किलमिटर पायी चालत जावे लागले. व्यापार, कारखानदारी ठप्प झाली, अनेकजण कर्जत बुडाले. कोविड नियंत्रण यंत्रणेत मोठे भ्रष्टाचार झाल्याचे ही नंतर उघड झाले आहे. आता कुठे उद्योग व्यवसाय सुरळीत होऊ पाहत आहेत. अशात पुन्हा लोकडाऊन लावल्यास जनतेचे प्रचंड हाल व देशाच्या अर्थव्यवस्थेवर संकट येणार आहे.

ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी ने केलेल्या अभ्यासात हे निष्पन्न झाले आहे की ज्या देशांमध्ये कडक लोकडाऊन पाळले गेले तेथे मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. अर्थव्यस्थेवर अनिष्ट परिणाम झाले. लहान मुलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम झाले असे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. ज्या देशांनी लोकडाऊन पाळले नाही त्यातील स्वीडन मध्ये कोविड काळात मृत्युदर, लोकडाऊन करणाऱ्या देशांपेक्षा कमी आहे. कोविड महामारी, स्पॅनिश फ्लू पेक्षा ५० ते ५०० पटीने कमी आहे असे त्यांचे म्हणणे आहे.

स्वतंत्र भारत पार्टीने पहिल्या पासूनच सक्तीच्या लोकडाऊनला विरोध केला आहे. सरकारने जर पुन्हा आशा निरुपयोगी, त्रासदायक व नुकसानकारक लोकडाऊनची घोषणा केली तर स्व. भा. पार्टी त्याला जाहीर विरोध करेल व स्वतःची काळजी घेत सर्व व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू ठेवण्याचे जनतेला आवाहन करणार आहे. पुन्हा लोकडाऊन न करण्या बाबतचे विंनतीपत्र आरोग्य मंत्रालयाला देण्यात येणार असल्याची माहिती स्वतंत्र भारत पार्टीचे अध्यक्ष , अनिल घनवट यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

वाचक क्रमांक : Visit counter For Websites


प्रकाश म्हस्के
संपादक

दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.

करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त

राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश

जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!

वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!

दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला

अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन

आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी

सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे

अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला

श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?

छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड

निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का

यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी

अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.

आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते

नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान

अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी

प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत

पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी