..म्हणून तृतीयपंथीयांनी पेटत्या चितेसमोर मांडली अघोरी पूजा
By : Polticalface Team ,26-12-2022
पुणे : गेल्या काही दिवसांपासून अंधश्रध्देचे अनेक प्रकार देशासह राज्यातील काही भागांत याआधी समोर आलेले आहेत. याविरोधात अनेकांनी प्रयत्न करुन असे प्रकार घडू नये यासाठी प्रयत्न केले आहेत. यासंदर्भात अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्यावतीने अनेकदा नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे. अंधश्रध्देविरोधात जनजागृती करण्यासाठी प्रगतशील समाज कायम अग्रेसर राहीला आहे. अशातच पुरोगामी महाराष्ट्रात एका पेटत्या चिते समोर दोन तृतीयपंथीयांना अघोरी पूजा करताना पोलिसांना त्यांनी रंगेहाथ पकडले होते. ही घटना नूकतीच असून ही पूजा का आणि कशासाठी करत असल्याचं अखेर या आरोपींनी पोलिसांना सांगितलंय.
स्मशानभूमीत अघोरी पूजा केल्याने धन मिळतं, चांगलं होतं, वेगैरे असा समज काही तांत्रिक-मात्रिकांकडून समाजात पसरवला जातो. याला बळी पडून सर्वसामान्य नागरिक त्यांच्या सांगण्याला बळी पडल्याच्या काही नवीन नाहीत. आता या घटनेत स्वत; तृतीयपंथीयच आपल्या स्वार्थासाठी पेटत्या चितेसमोर रात्री अपरात्री अघोरी पूजा करत असल्याचं समोर आल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय.
ही घटना महाराष्ट्राचं सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जाणाऱ्या पुण्यात घडल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच पुण्यातील उच्चभ्रू भागातील वैकुंठ स्मशानभूमीत एका रात्री दोन तृतीयपंथीयांकडून पेटत्या चितेसमोर अघोरी पूजा करण्यात आली होती. या प्रकाराची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्यांनी रंगेहाथ ताब्यात घेत दोन तृतीयपंथीयांना अटक केली.
लक्ष्मी निबाजी शिंदे आणि मनोज अशोक धुमाळ अशी या दोन तृतीयपंथीयांची नावं असून त्यांना अटक केल्यानंतर पोलिसांच्या चौकशीत त्यांनी आपल्या गुन्ह्याची कबूली दिलीय. अटक करण्यात आलेल्या दोन तृतीयपंथीयांपैकी एकाच्या आईला कॅन्सर आजार जडलेला होता. रात्री अपरात्री स्मशानभूमीत पेटत्या चितेसमोर अघोरी पूजा केल्यास आईचा कॅन्सर आजार बरा होईल, या समजातून त्या दोघांनी त्या रात्री वैकुंठ स्मशानभूमीतील पेटत्या चितेसमोर ठरल्याप्रमाणे अघोरी पूजा मांडण्याचा बेत आखला.
त्यानूसार या दोघांनीही तशी तयारी केली. आणि ठरललेल्या दिवशी, त्या वेळेत दोघांनी स्मशानभूमी गाठली. सोबत असलेल्या आपल्याला पूजेसाठी लागणाऱ्या साहित्याची मांडणी करुन त्यांनी आपल्या अघोरी कृत्याला सुरुवात केलीय. ही अघोरी पूजा मध्यान्हपर्यंत आली होती. अखेर त्याचवेळी पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि दोघा तृतीयपंथीयांच्या अघोरी पूजेचं भांड फुटलं, अशी कबुली या दोघा तृतीयपंथीयांनी पोलिसांना दिलीय.
दरम्यान, पुण्यासारख्या शहरात अशी घटना घडल्याने राज्यभरात हा विषय चर्चेचा बनला असून अंधश्रद्धेला आजही बळी पडणाऱ्यांची संख्या दिसून येत असल्याचे वास्तव या घटनेतून समोर आले आहे. या घटनेने सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून अशा समजांवर विश्वास ठेऊ नका, असं सातत्याने अंधश्रध्दा निर्मूलन समितीकडून राज्यातील जनतेला आवाहन करण्यात येतंय
वाचक क्रमांक :
प्रकाश म्हस्के
संपादक
दौंड शहरात एकच चर्चा आम्ही केलेली चूक दुरुस्त करता येते. तुम्ही ठरवा तुमची चूक दुरुस्त करणार का ? येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत दौंड ची जनता काय निर्णय घेणार याकडे लक्ष.
करमाळा पोलीस ठाणेची उल्लेखनीय कामगीरी... जेऊर येथे १ लाख ५० हजार २०० रुपये किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त
राज्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला आणि पगार बंदीला स्थगिती शिक्षक भारतीच्या पाठपुराव्याला यश
जनतेत नाराजीचा सूर; नेते सोयीनुसार बदलतात पक्ष, विचारधारा वेशीवर!
वांगदरी विद्यालयाच्या दहावी (२००१) बॅचचा २५ वर्षांनी पुन्हा रंगला शाळकरी आठवणींचा स्नेहसोहळा!
दौंड मध्ये लाच घेताना पोलीस कॉन्स्टेबल रंगेहात पकडला
अहिल्यानगर मध्ये बौद्धाचार्य श्रामणेर शिबिराचे उद्घाटन
आमदार नारायण आबा पाटील यांनी करमाळा तालुक्यातील नुकसानग्रस्त भागात बांधावर जाऊन केली प्रत्यक्षात पीक पाहणी
सेवानिवृत्तीनंतरच्या अनुभवाचा फायदा समाजासाठी व्हावा- सौ अनुराधाताई नागवडे
अतिवृष्टीत अडकलेल्या टँकरमधून मायलेकासह तिघांची धडाडीने सुटका – वालचंदनगर पोलिसांचा शौर्यप्रद दाखला
श्रीगोंदा तालुक्यात पावसाची कही ख़शी; कही गम अशी स्थितीश्रीगोंदा तालुक्यात 294.6 मिलिमीटर पावसाची नोंद या अवकाळी च्या जोरदार पावसामुळे खरीप हंगाम लांबण्याची शक्यता?
छत्रपती महाविद्यालयातील १० विद्यार्थ्यांची निकालाअगोदर विविध औषध कंपनीत नोकरीसाठी निवड
निमगाव सोसायटीवर जगताप पाटील गटाचा झेंडा तिसरी आघाडी सक्रिय झाल्याने प्रस्थापितांना धक्का
यवत गावातील नागरिकांना वळसा घालुन प्रवास करण्याची वेळ श्री काळभैरवनाथ मंदिरा जवळच्या पुलाखालून प्रवासी वाट सुरू करण्याची मागणी
अवकाळी पावसामुळे ही परिस्थिती ? दौंड शहरातील दुमजली दुकानाची भिंत अंगावर कोसळून जेष्ठ नागरिक महिलेचा मृत्यू.
आई ही विश्वाची जननी आहे तिचा विसर होता कामा नये ह भ प हरिभाऊ महाराज गीते
नुकसान ग्रस्त माजी विद्यार्थी चंद्रकांत वाजे यांना वर्गमित्रांकडून एक लाख एक हजार रुपयांची मदत , मुख्याध्यापक गवळी व पत्रकार कुरुमकर यांच्या हस्ते चंद्रकांत वाजेंना रक्कम प्रदान
अभिनव प्रज्ञाशोध परीक्षेत भारत प्रायमरी स्कूल जेऊरची सभ्यवी शेंडगे राज्यात तिसरी
प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या सर्व्हेसाठी गरजू लाभार्थ्यांनी 31 मे पर्यंत सर्व्हेक्षण करून घ्यावे - ॲड. राहुल सावंत
पिंपळगाव पिसा येथील साबळे वस्तीवर बिबट्याची दहशत , साबळेंच्या पाळीव कुत्र्याचा घेतला बळी