By : Polticalface Team ,04-01-2023
महावितरण जेऊर उपविभाग येथील सर्व कर्मचारी व अधिकारी आणि बाह्यस्त्रोत कर्मचारी वीज वितरण कंपनीच्या खाजगीकरण विरोधात 72 तासाच्या संपावर गेल्यामुळे जेऊर उपविभागातील 15 गावातील विज अक्षरशः गायब झाली आहे
जेऊर येथील महावितरण उपविभागाच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागणीसाठी आज 72 तासासाठी आपले कामकाज बंद ठेवून शासनाचा एक प्रकारे निषेध केला अदानी इलेक्ट्रिक कंपनीस वितरणाचा परवाना देऊ नये, राज्य सरकारने वीज कंपनीचे खाजगीकरणाचे धोरण रद्द करावे, महाराष्ट्रातील जनतेच्या मालकीचा वीज उद्योग खाजगी भांडवलदारांच्या घशात घालू नये ,कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना कायम करावे, वीज कंपन्यातील 42000 रिक्त जागा त्वरित भरण्यात याव्या, याशिवाय दिनांक 1/04/2019 नंतर कार्यान्वित केलेले उपकेंद्र ठेकेदारी पद्धतीने देऊ नये, अशा विविध मागण्यासाठी आज जेऊर येथील महावितरण उप विभागातील कर्मचाऱ्यांनी आपले कामकाज बंद ठेवून शासनाचा निषेध केला आहे यामुळे सदरचा संप हा शंभर टक्के यशस्वी झाला असल्याचे वीज वितरण कर्मचाऱ्यांनी बोलताना सांगितले आहे सदरच्या संपा मध्ये 31 संघटना उतरल्या असून करमाळा तालुक्यातील बार्शी इंजिनियर असोसिएशन तसेच फेडरेशन संघटना यादेखील संघटना पंतपती सहभागी झाल्या आहेत आपल्या विविध मागण्या संदर्भात जेऊर येथील उपकार्यकारी अभियंता अतुल गलांडे सहाय्यक अभियंता जेऊर अशोक परशु काळे सहाय्यक अभियंता अमोल चंदनशिवे तसेच ओमकार परीट सहाय्यक अभियंता कंदर नागेश साळुंखे कनिष्ठ अभियंता साडे याशिवाय फेडरेशनचे अध्यक्ष समीर शेख व त्यांचे संचालक भुजंग सूळ विनायक सरक आदी या संपा मध्ये शासनाचा लक्ष वेधण्यासाठी सहभागी झाले असल्याचे जेऊर उपविभागाचे सहाय्यक अभियंता अशोक काळे यांनी बोलताना सांगितले