भीमा पाटस कारखान्याचे पहिल्या पंधरवड्याचे बिल शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, ५ जानेवारी अखेर ५५ हजार टनाचे गाळप झाले.
By : Polticalface Team ,07-01-2023
दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड,
दौंड ता ०६ जानेवारी २०२३ दौंड तालुक्यातील भिमा पाटस साखर कारखाना अनेक दिवसांपासून बंद होता मात्र शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून दौंड तालुक्याचे आमदार व कारखान्याचे चेअरमन राहुल कुल यांच्या दूरदृष्टीच्या प्रयत्नाला येश आले आहे, भिमा पाटस साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास सुरू केल्या पासुन कारखान्याच्या सभासदांनी ऊस देण्यास सुरुवात केली.
दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांना भिमा पाटस साखर कारखाना सुरू झाल्याने दिलासा मिळाला आहे, सुरुवातीच्या पहिल्या पंधरवड्यात ३५ हजार टनाचे, २५०० रुपये प्रति टना प्रमाणे पाहिल्या हप्त्याचे नऊ कोटी रुपये संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहे, तसेच ऊस तोडणी व वाहतुकीचे बिल ही प्रत्येक दहा दिवसानंतर अदा करण्यात येणार असल्याचे भिमा पाटस साखर कारखान्याचे चेअरमन राहुल कुल यांनी माहिती दिली.
भिमा पाटस साखर कारखान्याने दि.५ जानेवारी अखेर ५५ हजार टनाचे गाळप केले असून कारखाना पुढील काळात अधिक गतीने चालणार आहे तालुक्यातील शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस कारखान्याला देऊन सहकार्य करावे असे आवाहन कारखान्याचे चेअरमन तथा आमदार कुल यांनी केले आहे.
वाचक क्रमांक :